विधानसभेला बाहेरून 20 हजार मतदार आणले आणि जिंकलो, शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांची कबुली

विधानसभेला बाहेरून 20 हजार मतदार आणले आणि जिंकलो, शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांची कबुली

मतचोरी करून सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असतानाच ‘विधानसभा निवडणुकीत मी बाहेरून 20 हजार मतदार आणले आणि जिंकलो’, अशी कबुली आज शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा करताच त्यांनी सारवासारवही केली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे मतचोरी करून सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या याचा भंडाफोड लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. महाराष्ट्रात कशा प्रकारे मतचोरी झाली याचे पुरावेही त्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे पैठणचे आमदार विलास भुमरे यांचे विधान चर्चेत आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास 20 हजार मतदार हे मी बाहेरून आणले, या मतदानाचा मला शंभर टक्के फायदा झाला, असे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा मेळावा आज येथे पार पडला. यावेळी ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा जिंकायच्या’ या विषयावर मार्गदर्शन करताना विलास भुमरे यांनी विधानसभेला बाहेरून मतदार आणून आपण निवडणूक जिंकल्याची कबुली दिली.

एकनाथ शिंदेंनी इशारा करताच सारवासारव

भरमेळाव्यात बाहेरून मते आणल्याची कबुली विलास भुमरे यांनी देताच मंत्री संजय शिरसाट यांना सांगून एकनाथ शिंदे यांनी विलास भुमरे यांचे भाषण मध्येच थांबवले आणि इशारा केला. त्यानंतर भुमरे यांनी माझ्या मतदारसंघातील 20 हजार मतदार हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मी घेऊन आलो, अशी सारवासारव केली. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुर्नूलनंतर रांचीत बसमध्ये अग्नितांडव, 40 हून अधिक प्रवासी थोडक्यात बचावले कुर्नूलनंतर रांचीत बसमध्ये अग्नितांडव, 40 हून अधिक प्रवासी थोडक्यात बचावले
कुर्नूलमधील बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच झारखंडमधील रांची येथे बसला आग लागली. शनिवारी संध्याकाळी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग...
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनात अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू; 13 जण जखमी
संपूर्ण जीवनात महिला किती किलो लिपस्टीक खातात ? जाणून बसेल धक्का
भारतात श्वास घेणंही कठीण, प्रदूषणामुळे गेल्या 10 वर्षांत 38 लाख जणांचा मृत्यू
एमडी होण्याचे स्वप्न भंगले… शैक्षणिक कर्जही फिटले नाही; आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
औषध कंपन्यांनी भाजपला ९४५ कोटी रुपयांची दिली देणगी, सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंबद्दल दिग्विजय सिंह यांचा दावा
भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी; निर्णयाकडे देशभरातील प्राणीप्रेमींचे लक्ष