रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा, शिवसेनेची पालिकेकडे जोरदार मागणी

रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा, शिवसेनेची पालिकेकडे जोरदार मागणी

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात विकासाची रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशी जोरदार मागणी शिवसेनेने पालिकेकडे आज केली. याबाबत शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी रखडलेली विकासकामे, सोयीसुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन आयुक्तांनी शिवसेना शिष्टमंडळाला दिले.

शिवसेनेच्या मागणीमुळे प्रयाग नगर, प्रकाश नगर, वाशीनाका येथील आरएमसी प्लांटला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. तर गव्हाण गाव चेंबूर येथील  पाणी प्रश्न सोडवावा, गोवंडी शताब्दी रुग्णालयाचे खासगीकरण न करता सोयीसुविधा वाढवाव्यात, डॉक्टर-औषध पुरवठा वाढवावा, कोळीवाडा, देवनार गाव या ठिकाणच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणीही करण्यात आली. या वेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विभागप्रमुख व आमदार महेश सावंत, माजी महापौर श्रद्धा जाधव, महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे, माजी नगरसेविका निधी शिंदे, माजी नगरसेवक अनिल पाटणकर, विठ्ठल लोकरे, विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, विधानसभा संघटक गजानन पाटील, निमीष भोसले, नीलम डोळस, निरीक्षक विनायक म्हात्रे, शाखाप्रमुख किरण म्हात्रे, उमेश करकेरा, संदीप वेताळे, महिला शाखा संघटक दक्षता पाताडे, उपविभाग अधिकारी व खासदार प्रतिनिधी रुपेश मढवी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी – हर्षवर्धन सपकाळ राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी – हर्षवर्धन सपकाळ
“भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता...
पक्ष्याच्या धडकेमुळे एअर इंडियाच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, नागपूर-दिल्ली फ्लाइट रद्द
234 मोबाईल फोनमुळे आग आणखी पसरली, करनूल बस अपघाताप्रकरणी धक्कादायक खुलासा
Mumbai News – मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द तर काही 20 मिनिटे उशिराने
कागलमध्ये आकाश पाळणा ८० फुटांवर अडकला, दोन तास रेस्क्यू ऑपरेशन, १६ जणांची सुखरूप सुटका
भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या 8 जणांना चिरडले, 5 जणांचा जागीच मृत्यू; तिघांची प्रकृती चिंताजनक
कर्जमाफी झालीच पाहिजे, अजित पवार यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांची घोषणाबाजी