सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणतात… शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय!

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणतात… शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय!

अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना काही लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, असे वादग्रस्त विधान करत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पाटील म्हणाले, निवडणुकीत आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्ही आश्वासनं देतो. निवडणुकीच्या काळात कुणी गावात नदी आणून द्या अशी मागणी केली तर त्यालाही गावात नदी आणून देण्याचे आश्वासन दिले जाते. त्यामुळे लोकांनी काय मागायचे हे ठरवले पाहिजे. दरम्यान, टीका होताच या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशी सारवासारव त्यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गव्हाची चपाती खाण्याऐवजी एक महिना या पिठाची भाकरी खा, झटपट वजन कमी करा गव्हाची चपाती खाण्याऐवजी एक महिना या पिठाची भाकरी खा, झटपट वजन कमी करा
आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्यासाठी लोकांना वेळ काढता येत नाहीए. त्यामुळे सकाळी नाश्त्याला फाटा मिळत आहे. तसेच दुपारी जे मिळेल ते...
शरीरात कर्करोग आहे की नाही? ‘हे’ कसे कळेल? जाणून घ्या
दिल्लीत हवेची गुणवत्ता आणखी खालावली; AQI 400 पार, दमाच्या रुग्णांमध्ये वाढ
प्रवासी जीप 700 फूट खोल दरीत कोसळली; 8 जणांचा मृत्यू; 10 गंभीर जखमी
बायको सतत रील्स बनवायची, चिडलेल्या नवऱ्याने घेतला जीव
राज्यसभा निवडणुकीबाबत भाजपने डील ऑफर केली होती, फारुक अब्दुल्ला यांचा गौप्यस्फोट
अदानी समूहात LIC ची 33,000 हजार कोटींची गुंतवणूक? ग्राहकांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा गैरवापर; काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल