‘कांतारा’चा मराठी चित्रपटाला बसला फटका, हाऊसफुल्ल असताना ही नाट्यगृहात करावं लागलं शोचं आयोजन

‘कांतारा’चा मराठी चित्रपटाला बसला फटका, हाऊसफुल्ल असताना ही नाट्यगृहात करावं लागलं शोचं आयोजन

बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांपुढे मराठी चित्रपटांना मिळणारे दुय्यम स्थान हा जणू रोगच झाला आहे. ‘कुर्ला टू वेंगुर्ला’च्या बाबतीतही हेच घडलं आहे. मराठी माती आणि नाती यांचा सुगंध घेऊन आलेला ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला आणि रसिक प्रेक्षकांसह समीक्षकांच्याही पसंतीस उतरला. कोणत्याही धनाड्य व्यक्ती किंवा कॉर्पोरेटचे पाठबळ नसलेल्या या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यातही सुद्धा प्रेक्षक थिएटरमध्ये खेचून आणलं. मात्र ‘कांतारा’ (kantara chapter 1) प्रदर्शित होताच या चित्रपटाला मोठा फटका बसला आहे.

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हाऊसफुल्ल चलता असतानाही जवळजवळ सर्वच थिएटरमधून काढून टाकण्यात आला. सध्या फक्त गोरेगावच्या मूव्हीटाईम हब येथे एकमेव शो हाऊसफुल्ल चालतोय. यामुळे मराठी चित्रपटांना बॉलीवूड आणि साऊथ दाक्षिणात्य चित्रपटांसमोर मिळणारी ही दुजाभावाची वागणूक पुन्हा एकदा समोर आली आहे.

दरम्यान, ‘कांतारा’मुळे थिएटर मिळत नसल्याने ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटासाठी आता वेंगुर्लेकर पुढे सरसावले आहेत. थिएटर नाही म्हणून वेंगुर्लेकरांनी वेंगुर्ल्यातील मधुसूदन कालेलकर नाट्यगृह येथे या चित्रपटाचे दोन शोचे आयोजन केले आणि बघता बघता दोन्ही शो हाऊसफुल्ल झाले. यातच अजून शोजची मागणी आली. निर्मात्यांना प्रेक्षकांच्या मागणीनुसार एका दिवसात चार शो लावावे लागले आणि काही मिनिटातच हे चारही शो हाऊसफुल्ल झाले. रसिक प्रेक्षकांनी हा सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला.

मुलांची न होणारी लग्न आणि शहरांना घेऊन असलेले आकर्षण हा विषय घेऊन हसत खेळत निखळ मनोरंजन करणारा हा सिनेमा शेवटी अंतर्मुख करतो. मराठी चित्रपट चालत नाहीत किंवा ते चांगले नसतात अशी बोंबाबोंब करणाऱ्या तोंडांना लेखक अमरजीत आमले आणि दिग्दर्शक विजय कलमकर यांनी “अ’ दर्जाचे उत्तर दिले आहे. पण राजाश्रय नसल्याकारणाने लोकचळवळीतून तयार झालेला हा सिनेमा सर्व दूर पोहोचत नाही आहे, जी आत्ताची गरज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Alcohol Consumption : उपाशी पोटी दारू पिणे योग्य की अयोग्य? शरीरावर नेमका काय परिणाम होतो? Alcohol Consumption : उपाशी पोटी दारू पिणे योग्य की अयोग्य? शरीरावर नेमका काय परिणाम होतो?
अनेकांना मद्यपान म्हणजेच दारू पिण्याची सवय असते. काहीकाही महाभाग तर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटीच दारूची बॉटल तोंडाला लावतात. दारूच्या आहारी...
दिवाळीचे पदार्थ जास्त खाल्ल्याने पोट बिघडलंय? तर तज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ उपायांचा करा अवलंब काही क्षणातच मिळेल आराम
सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलाच्या पायावरून गेली गाडी, मुलगा गंभीर जखमी
चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटकात तांत्रिक बिघाड; वाहतूक ठप्प
सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी, जीविका दीदांना ३० हजार रुपयांचे वेतन; तेजस्वी यादव यांनी केल्या तीन मोठ्या घोषणा
हवेचा AQI 400 च्या पुढे गेला तर मूड, मेंदूवर परिणाम होतो? जाणून घ्या
नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना करणार बंद – विजय वडेट्टीवर