राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं; सरकारच्या तुटपुंजी मदतीवरून कैलास पाटील यांची टीका

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं; सरकारच्या तुटपुंजी मदतीवरून कैलास पाटील यांची टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे. मात्र ही मदतीची घोषणा म्हणजे ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’, अशी असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे.

X वर पोस्ट करत कैलास पाटील म्हणाले आहेत की, “सरकारने हेक्टरी फक्त १८,५०० ते ३२,५०० रुपये नुकसानभरपाई जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ही काही ठोस मदत नाही तर, शेतकऱ्यांचा अपमान आहे. सत्ताधारी म्हणत आहेत की आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज दिलंय, मग पंजाब सरकारप्रमाणे हेक्टरी ५०,००० रुपये मदत का नाही दिली? आज एक एकरी शेतीचा खर्च ३० ते ४० हजारापर्यंत जातो, मग १८,५०० ते ३२,५०० रुपयाच्या थोडक्या मदतीतून शेतकरी सावरणार कसा? हा दिलासा नाही, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक आहे.”

कैलास पाटील म्हणाले, “रब्बी आणि विम्याचं गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, कर्जमाफीच्या घोषणेसारखीच ही फसगत आहे. कर्जमाफीसाठी ही योग्य वेळ नव्हती का? कर्जमाफीसाठी आणखी किती नुकसान होण्याची गरज होती? कधी येणार योग्य वेळ जेव्हा शेवटचा शेतकरी फाशी लावून घेईल तेव्हा का? विद्यार्थ्यांच्या बाबतीतही तेच, परीक्षा शुल्क जास्त असतो की शैक्षणिक शुल्क हे ही राज्यकर्त्यांना माहीत नाही का? या शब्दांच्या खेळात मुलांचही भविष्य अडकवलंय. हे सरकार फक्त फसव्या घोषणांचं आणि आकड्यांचं गाजर दाखवत आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हवेचा AQI 400 च्या पुढे गेला तर मूड, मेंदूवर परिणाम होतो? जाणून घ्या हवेचा AQI 400 च्या पुढे गेला तर मूड, मेंदूवर परिणाम होतो? जाणून घ्या
दिवाळी असल्याने फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर हवेची गुणवत्ता खालावली आहे. तिकडे दिल्लीचा एक्यूआय 400 च्या पुढे गेला आहे तर इतरही ठिकाणी...
नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना करणार बंद – विजय वडेट्टीवर
माभळे गावात सलग पाचवी पिढी राबवत आहे सामूहिक शेतीचा अनोखा प्रयोग, 20 कुटुंबातील 70 माणसे करत आहेत एकत्र शेती
परळची देवी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे आदिवासी पाड्यात आधुनिक शैक्षणिक साहित्याचे वाटप
सकाळी पोट साफ होत नसेल तर ही गोष्ट करून बघा, वाचा
‘रुपेरी सोनसळा’… नांदेडकरांनी अनुभवला मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा सुरेल व समृद्ध प्रवास
हिंदुस्थान S-400 सिस्टीमसाठी रशियासोबत करणार 10 हजार कोटींचा करार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी विमानांना पडण्यास झाली होती मदत