देश जळतोय आणि तू झोपतोय? परमात्म्याच्या आदेशामुळेच सरन्यायाधीशांवर बूट फेकला; हल्लेखोराचा दावा

देश जळतोय आणि तू झोपतोय? परमात्म्याच्या आदेशामुळेच सरन्यायाधीशांवर बूट फेकला; हल्लेखोराचा दावा

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी सुरू असताना एका वकिलाने ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. राकेश किशोर असे त्या वकिलाचे नाव असून त्यांनी आपण हे सर्व परमात्म्याच्या सांगण्यावरून केल्याचा अजब दावा केला आहे. ANI ला दिलेल्या मुलाखतीत या वकिलाने त्यांनी जे केले त्याचा पश्चाताप नसून आपण कुणाचीही माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.

”मी जे काही केलं त्याचा मला जराही प्रायश्चित नाही. मी कुणाचीही माफी मागणार नाही. तुम्ही मला प्रश्न करताय. पण मी काहीही केले नाही ही परमात्माची इच्छा आहे. मी जेलमध्ये जावे, मला फाशी व्हावी ही परमात्याची इच्छा असेल म्हणून मी हे केले. मी आधीच ठरवून कोर्टात गेलो होतो कारण 16 सप्टेंबर नंतर मला झोप येत नव्हती. परमात्मा मला झोपेतून उठवून सांगत होता की देश जळतोय आणि तु झोपतोय? त्यामुळे मी हे केले. मी माझ्या सोबत दोन दिवसांची औषधं घेऊन गेलो होतो. मला वाटलेलं दोन दिवस मला तुरुंगात राहावं लागेल. पण सरन्यायधीशांनी माझ्यावर कारवाई केली नाही. याला मी त्यांचे उपकार मानू की काय मानू ते समजत नाहीए. पोलिसांनी माझी चौकशी झाली. त्यांनी मला जेवण दिलं चहा बिस्किट दिला. त्यासाठी मी त्यांचे उपकार मानतो”, असे राकेश किशोर म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले, वकील तरुणाने सात जणांना चिरडले क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले, वकील तरुणाने सात जणांना चिरडले
क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले आणि सात नागरिकांना चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच...
ग्लासात बॉम्ब फोडणे जीवावर बेतले, स्फोटानंतर शरीरात स्टीलचे तुकडे घुसल्याने तरुणाचा मृत्यू
दिल्ली-आग्रा मार्गावर मालगाडीचे 12 डबे घसरले, रेल्वे वाहतूक ठप्प
बिहार निवडणुकीत अंधश्रद्धेचा काळाबाजार, तांत्रिक विधींसाठी खरेदी केले जात आहेत घुबड-मुंगूस
Ratnagiri News – कोकणातला कलाकार आता मुंबईच्या रंगभूमीवर, लांजातील ‘रंग भरू दे आमुच्या रे गणा’ ची मुंबईत धडक
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष सार्कोजी यांची पाच वर्षांसाठी तुरुंगात रवानगी, काय आहे प्रकरण?
दिल्ली बनलं जगातील सर्वात प्रदूषित शहर, हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली