न्यायव्यवस्थेत आशेचा किरण दिसतोय, संविधान, घटनेचा आदर करत न्याय मिळण्याची आशा – संजय राऊत

न्यायव्यवस्थेत आशेचा किरण दिसतोय, संविधान, घटनेचा आदर करत न्याय मिळण्याची आशा – संजय राऊत

शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेत आजही आशेचा किरण दिसत आहे. न्यायदेवता आम्हाल न्याय देईल, अशी आशा आहे, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच आम्हाला 4 वर्षांपासून न्याय मिळथ नसल्याने न्यायव्यवस्था प्रतिष्ठा गमावून बसल्याचे दिसत आहे, अशा शब्दांत त्यांनी परखड मत व्यक्त केले.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी आहे. आम्हाला अजूनही आशेचा किरण दिसतोय. न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आहे. संविधान, घटना आणि पक्षांतराबाबत जो कायदा करण्यात आला आहे त्याबाबत न्यायदेवता आम्हाल न्याय देईल, अशी आशा आजही आहे. शिवसेना गेली 4 वर्षे न्यायासाठी झगडते आहे. कायदेशीर पद्धतीने आमचा लढा सुरू आहे. मात्र, आम्हाला तारीख पे तारीख मिळते. न्याय मिळत नाही. त्यामुळे आपली न्यायव्यवस्था प्रतिष्ठा गमावून बसली आहे, असे दिसत आहे. त्यामुळे आधीचे सर्व सरन्यायाधीश जोडे खायच्या लायकीचे होते.

प्रबोधनकारांचे पुस्तक आजही अनेकांना भेट दिले जाते. त्याचे पुस्तक देणे, यात काही गैर नाही. त्यावर बंदी नाही. फक्त त्या पुस्तकात हिंदू धर्मातील ढोंगावर प्रखर भाष्य आहे. देवा, धर्माच्या नावावर कशी लूट केली जाते, जनतेला कसे फसवले जाते, यावर त्यांनी प्रकाश टाकले आहे, त्यात काहीही गैर नाही, आगामी काळात या पुस्तकाची मागणी आमखी वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले, वकील तरुणाने सात जणांना चिरडले क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले, वकील तरुणाने सात जणांना चिरडले
क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले आणि सात नागरिकांना चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच...
ग्लासात बॉम्ब फोडणे जीवावर बेतले, स्फोटानंतर शरीरात स्टीलचे तुकडे घुसल्याने तरुणाचा मृत्यू
दिल्ली-आग्रा मार्गावर मालगाडीचे 12 डबे घसरले, रेल्वे वाहतूक ठप्प
बिहार निवडणुकीत अंधश्रद्धेचा काळाबाजार, तांत्रिक विधींसाठी खरेदी केले जात आहेत घुबड-मुंगूस
Ratnagiri News – कोकणातला कलाकार आता मुंबईच्या रंगभूमीवर, लांजातील ‘रंग भरू दे आमुच्या रे गणा’ ची मुंबईत धडक
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष सार्कोजी यांची पाच वर्षांसाठी तुरुंगात रवानगी, काय आहे प्रकरण?
दिल्ली बनलं जगातील सर्वात प्रदूषित शहर, हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली