गौतम अदानी ही मोदींची बेनामी संपत्ती, त्यांच्यावर भार लावा; संजय राऊत यांची टीका

गौतम अदानी ही मोदींची बेनामी संपत्ती, त्यांच्यावर भार लावा; संजय राऊत यांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहिल्यानगर येथे केलेल्या भाषणातून आज अधोरेखित झाले. पंचनामे होऊ द्या, मग मदतीचे पाहू, असे अमित शहा म्हणाले आहेत. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकार व केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. ”महाराष्ट्र पण तुमच्याच देशाचा भाग आहे, तुम्ही प्रस्तावाशिवाय मदत पाठवू शकता, गुजरातला केली होतीच ना तौक्ते वादळाच्या वेळी. ते वादळ आले होते तेव्हा शहा आणि मोदी यांनी विमानात बसताना हजारो कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती”, अशा शब्दात संजय राऊत यांना मोदी सरकार व अमित शहांना सुनावले.

”शेतकऱ्यांचा उस घेणाऱ्या महाराष्ट्रावर भार लावण्यापेक्षा गौतम अदानीवर, लोढा, अंबानी, कंबोज यांच्यावर भार लावा”, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदी व महायुती सरकारला फटकारले आहे. शेतकऱ्यांचा उस घेणाऱ्या महाराष्ट्रावर हा भार घालण्यापेक्षा गौतम अदानीवर भार लावा. त्याला मुंबईतल्या जागा फुटकात, मिठागरं, खणीज संपत्ती, टोलनाके फुकटात दिले. शेतकऱ्यांवर व कारखानदारांवर भार देण्यापेक्षा लोढा, अडाणी, अंबानी, कंबोज यांच्यावर भार लावा. गौतम अडाणी ही मोदींची बेनामी संपत्ती आहे. हिंमत आहे का अडाणीवर भार लावा. घ्या अडाणीकडून 50हजार कोटी, घ्या अंबानीकडून 20 हजार कोटी कडून. त्यांच्यावर भार लावत नाही. तुम्ही राज्याची ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मोडून काढतायत, असे संजय राऊत म्हणाले.

”मी महायुती मानत नाही. हे शिंदे, अजित पवार गट जे आहेत ते अमित शहांच्याच बेनामी कंपन्या आहेत. त्यांच्यातील 90 टक्के शेअर्स अमित शहांकडे आहेत त्यांना वाटेल तेव्हा ते या कंपन्या बंद करतील”, असा टोला त्यांनी लगावला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रस्ताव पाठवा मग मदत पाठवू असं बोलले म्हणजे असून महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप प्रस्ताव नाही पाठवला. इतके दिवस झाले अजून प्रस्ताव नाही. पण महाराष्ट्र पण तुमच्याच देशाचा भाग आहे, तुम्ही प्रस्तावा शिवाय तुम्ही मदत पाठवू शकता, गुजरातला केली होतीच ना तौक्ते वादळाच्या वेळी. ते वादळ आले होते तेव्हा शहाआणि मोदी यांनी विमानात बसताना हजारो कोटी रुपये दिले होते, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लग्नाची पत्रिका द्यायला मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू, भाऊ किरकोळ जखमी लग्नाची पत्रिका द्यायला मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू, भाऊ किरकोळ जखमी
लग्नाची पत्रिका देण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तळवडे–आंब्रड मार्गावर घडली. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास...
ज्येष्ठ अभिनेते असरानी काळाच्या पडद्याआड, वयाच्या 84 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ratnagiri News – परतीच्या पावसात हरभरा, पावटा, तूर पीक घेण्यास शेतकरी सरसावला; भात कापणीबरोबर केली जाते वायंगणी शेती
Jalna News – कंत्राटदाराच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा पर्दाफाश, चंदनझिरा पोलिसांची कामगिरी
Nanded News – बस आणि खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात, 27 प्रवासी जखमी
ICC Women’s World Cup 2025 – श्रीलंकेच्या कर्णधाराची विक्रमाला गवसणी, असं करणारी पहिलीच खेळाडू
उमेदवारी अर्ज दाखल करताच RJD उमेदवाराला पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण?