‘हा लोकशाही, संविधान आणि देशाचा घोर अवमान’; सर्वोच्च न्यायालयातील घटनेवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

‘हा लोकशाही, संविधान आणि देशाचा घोर अवमान’; सर्वोच्च न्यायालयातील घटनेवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर झालेल्या शूजफेकीच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र निषेध केला आहे. हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे, तर लोकशाही आणि संविधानाचा घोर अवमान आहे, असे ते म्हणाले.

शरद पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, न्यायव्यवस्था ही लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांवर आधारित वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेवर अशा प्रकारे हल्ला होणे हे देशासाठी धोक्याचे आहे.

‘आपल्या देशात पेरले जाणारे विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे’, असे पवार म्हणाले. त्यांनी या घटनेचा निषेध करत, कोणत्याही परिस्थितीत देशातील लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.

ही घटना आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात घडली, जिथे एका वृद्ध व्यक्तीने सरन्यायाधीशांवर शूज फेकला. सुदैवाने, शूज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही आणि आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे विचलित न होता, सरन्यायाधीशांनी सुनावणी सुरू ठेवली.

ही घटना सरन्यायाधीशांनी एका खटल्यादरम्यान केलेल्या टिप्पणीनंतर घडली, ज्यावर सोशल मीडियावर बरीच टीका झाली होती. त्यांनी एका याचिकेवर बोलताना, ‘जा आणि देवालाच काहीतरी करायला सांगा’, असे म्हटले होते. या टिप्पणीचा निषेध म्हणून हा हल्ला झाल्याचे मानले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लग्नाची पत्रिका द्यायला मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू, भाऊ किरकोळ जखमी लग्नाची पत्रिका द्यायला मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू, भाऊ किरकोळ जखमी
लग्नाची पत्रिका देण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तळवडे–आंब्रड मार्गावर घडली. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास...
ज्येष्ठ अभिनेते असरानी काळाच्या पडद्याआड, वयाच्या 84 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ratnagiri News – परतीच्या पावसात हरभरा, पावटा, तूर पीक घेण्यास शेतकरी सरसावला; भात कापणीबरोबर केली जाते वायंगणी शेती
Jalna News – कंत्राटदाराच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा पर्दाफाश, चंदनझिरा पोलिसांची कामगिरी
Nanded News – बस आणि खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात, 27 प्रवासी जखमी
ICC Women’s World Cup 2025 – श्रीलंकेच्या कर्णधाराची विक्रमाला गवसणी, असं करणारी पहिलीच खेळाडू
उमेदवारी अर्ज दाखल करताच RJD उमेदवाराला पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण?