पुणे महापालिकेच्या पथ विभागाचा आंधळा कारभार; दोषदायित्व कालावधीची माहिती असतानाही पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या खोदाईस परवानगी

पुणे महापालिकेच्या पथ विभागाचा आंधळा कारभार; दोषदायित्व कालावधीची माहिती असतानाही पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या खोदाईस परवानगी

गेल्या दोन वर्षांत सुमारे ४०० कोटी खर्चुन रस्ते चांगले केले होते. या रस्त्यांना पाच वर्षांचा ‘दोषदायित्व कालावधी’ (डिफेक्ट लायबिलिटी पीरिएड) असल्याची माहिती असतानाही पथ विभागाने पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या केबलसाठी खोदाईला परवानगी दिली आहे. ‘डीएलपी’ अंतर्गत असलेल्या तब्बल २८ किलोमीटर रस्त्यांवर पोलिसांच्या सीसीटीव्ही केबल नेटवर्कसाठी खोदाईला परवानगी दिल्याची माहिती ‘सजग नागरिक मंच’ला पालिकेने दिलेल्या माहितीतून समोर आली आहे.

शहराच्या सुरक्षेसाठी शहरात सुमारे १२०० सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. राज्य गृह विभागाच्या माध्यमातून राबविला जाणारा हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने ५०० किलोमीटर खोदाईवर आधारित आहे. या खोदाईनंतरही संबंधित रस्त्यांची दुरुस्ती महापालिकेनेच करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे पुन्हा या रस्तेदुरुस्तीचा २०० ते ३०० कोटींचा भार महापालिकेलाच उचलावा लागणार आहे. मात्र, पावसाळ्यात कुठलेही खोदकाम करण्यास महापालिका परवानगी देत नाही. आधीच पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे असतात आणि अशा परिस्थितीत आणखी खोदकाम केलेले रस्ते दर्जेदाररीत्या दुरुस्त करणे अशक्यच असते. याशिवाय यातले अनेक रस्ते कंत्राटदारांच्या ‘डीएलपी’मध्ये आहेत, ज्यावर खोदकाम केले की, कंत्राटदारांची ‘डीएलपी’मधून सुटकाच होणार आहे.

नागरिकांचा मनस्ताप थांबवा !
ओंकारेश्वर ते रमणबाग असा शनिवार पेठेतील जवळपास १ कि.मी. रस्ता आणि फुटपाथ खणून ठेवला आहे. आधीच अरुंद रस्ते, भिडे पूल वाहतुकीसाठी बंद आणि त्या भागातील तीन-तीन शाळा यामुळे प्रचंड वाहतूककोंडीने नागरिकांचे जीवन असह्य झाले आहे. पथ विभागाचा आजवरचा कारभार पाहता, रस्तेदुरुस्ती दर्जेदार होईल यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. महापालिका दुरुस्ती कधी करणार? याचा पत्ता नसल्याने नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे, याकडेही ‘सजग नागरिक मंच’ने लक्ष वेधले आहे.

संपूर्ण शहरातील या कामासाठी लागणारे जवळपास ३०० कोटी मिळण्याकरिता राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करण्याचा महापालिकेचा इरादा आहे. आता ही जबाबदारी पुण्यातील दोन मंत्री आणि आमदार उचलतील का? हा खरा प्रश्न आहे.
-विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जालना महापालिकेच्या आयुक्तांना लाच घेताना रंगेहात पकडले, लाचलुचपत विभागाची कारवाई; दहा लाखांची रोकड जप्त जालना महापालिकेच्या आयुक्तांना लाच घेताना रंगेहात पकडले, लाचलुचपत विभागाची कारवाई; दहा लाखांची रोकड जप्त
जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेतील विविध...
अपराजिताच्या फूलाचे आरोग्यदायी रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल…!
ICMR चा अहवाल,भारतीय जेवण रुचकर परंतू आरोग्यासाठी हानिकारक
स्कूल व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग, चिपळूणमध्ये संतापाची लाट
ज्ञानेश कुमार तोंड लपवून का बसले आहेत? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
Ranji Trophy 2025-26 – मुंबईविरुद्ध 40 वर्षीय खेळाडूने ठोकलं ऐतिहासिक शतक
कर्नाटकातील शाळा आणि कॉलेजमध्ये संघाच्या कार्यक्रमांवरील बंदी, राज्य सरकारचा निर्णय