कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी दांपत्याची आत्महत्या, पत्नीने विहिरीत उडी मारली, अंत्यसंस्कार उरकून त्याच विहिरीजवळ पतीचा गळफास

कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी दांपत्याची आत्महत्या, पत्नीने विहिरीत उडी मारली, अंत्यसंस्कार उरकून त्याच विहिरीजवळ पतीचा गळफास

पाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींनी शेतकरीवर्गाचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील हजारो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली गुदमरून आत्महत्येसारखी पावले उचलत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्जबाजारी शेतकरी दांपत्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. पत्नीने विहिरीत उडी घेतली तर तिच्यावर अंत्यसंस्कार उरकून परतल्यानंतर त्याच विहिरीजवळ पतीने गळफास घेतला. कर्जबाजारीपणामुळे दोघांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचा संदेश त्याने व्हॉट्सअॅपवर टाकला होता.

छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 43 वर्षीय शेतकरी विलास रामभाऊ जमधडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या नावावर 43 गुंठे जमीन होती. शेतीतून पुरेसे उत्पन्न न मिळाल्याने ते पत्नी रमाबाई यांच्यासमवेत मजुरी करून उदरनिर्वाह भागवत होते, मात्र त्यांच्यावर बँक, सोसायटी तसेच खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते. रमाबाई यांच्यावरही बचत गटाचे कर्ज होते.

कर्ज फेडायचे कसे या चिंतेत रमाबाई यांनी शुक्रवारी शेतातील विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मुले आणि नातेवाईक घरी गेले. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास विलास जमधडे यांनी गावापासून दोन किलोमीटर दूर असलेल्या शेतात जाऊन व्हॉट्सअॅप ग्रुपवर कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत असल्याची पोस्ट केली आणि रमाबाई यांनी आत्महत्या केलेल्या विहिरीजवळील झाडाला गळफास घेतला. मेसेज वाचताच गावकऱ्यांनी जमधडे यांच्या शेताकडे धाव घेतली. तिथे झाडाला लटकलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला.

माझी प्रिय मुले…

जमधडे यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर केलेला मेसेज वाचूनही अनेकांना अश्रू आवरले नाहीत. ‘मी विलास रामभाऊ जमधडे, माझ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पीक कर्ज असल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझ्या बायकोने पण काल बँकेचे कर्ज असल्यामुळे आत्महत्या केली. सुमित, अमित मला माफ करा, पण माझी शेवटची इच्छा तुम्ही आळंद येथूनच शिक्षण पूर्ण करा. माझी प्रिय मुले.’ असे त्यांनी मेसेजमध्ये लिहिले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;