लातूर जिल्ह्यात भुगर्भातून आवाजाची मालिका सुरुच, वेधशाळेकडून भुकंप नसल्याचे स्पष्ट

लातूर जिल्ह्यात भुगर्भातून आवाजाची मालिका सुरुच, वेधशाळेकडून भुकंप नसल्याचे स्पष्ट

लातूर जिल्ह्यात सौम्य भुकंपाच्या घटना नंतर काही भागांमध्ये भुगर्भातून मोठ्या प्रमाणात आवाज येण्याची मालिकाच सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे परंतु तो भुकंप नसल्याचे वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे कासारशिरसी परिसरात भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. त्यानंतर लातूर तालुक्यातील मौजे मुरुड अकोला आणि बोरवटी हे भुकंपाचे केंद्र बिंदू झाले होते. त्यानंतर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील काही भागातून भूगर्भातून आवाज ऐकू येत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. दि. 27.09.2025 रोजी सायं. 7.37 वा. लातूर तालुक्यातील दगडवाडी (रामपूर मळा) येथे जमिनीतून आवाज ऐकण्यास आला असून गेल्या तीन दिवसांपासून अशा प्रकारचे आवाज येत असल्याचे स्थानिकांकडून कळविण्यात आले आहे. दि. 28.09.2025 रोजी पहाटे 4.30 वा. सुद्धा जमिनीतून मोठा आवाज आल्याची माहिती मिळाली आहे.

दि. 24.09.2025 पासून मौजे सलगरा, तालुका लातूर येथे भूगर्भातून आवाज ऐकण्यात येत असून शेवटची घटना दि. 28.09.2025 रोजी दुपारी 1.00 वा. घडली आहे. दि. 28.09.2025 रोजी सायं. 5.25 वा. मौजे राणी अंकुलगा, तालुका शिरूर अनंतपाळ येथे भूकंपसदृश्य मोठा आवाज ऐकण्यात आल्याची नोंद झाली आहे.

या संदर्भात राष्ट्रीय भूकंप मापन केंद्र, भूगर्भशास्त्र विभाग, नवी दिल्ली यांचेकडे चौकशी केली असता वरील कोणत्याही घटनेत भूकंपाची नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जमिनीत वॉटर फ्लक्स होणे व पोकळ जागेतून गॅस बाहेर पडणे या नैसर्गिक कारणांमुळे अशा प्रकारचा आवाज निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;