हिंगोलीत अतिवृष्टी, शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हिंगोलीत अतिवृष्टी, शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हिंगोलीत शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत शिवारात गुडघ्या एवढे पाणी साचून पिकांचा चिखल झाला आहे. तर धरणाच्या वरील बाजूस पाण्याची आवक वाढल्याने इसापूर येलदरी सिद्धेश्वर या धरणांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला तर शनिवारी पहाटे जिल्ह्यातील 19 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मागील दोन दिवस पावसाने घातलेल्या थैमानामुळे शेत शिवारात पाणी साचून पिकांचा चिखल झाला आहे. तर वसमत कळमनुरी हिंगोली तालुक्यातील काही गावांमध्ये नदी, नाले ओढ्याचे पाणी शिरल्यामुळे अनेकांना इतरत्र स्थलांतरित करावे लागले. पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्यासह अन्नधान्याची नासाडी झाली आहे. जिल्ह्यातील धरण प्रकल्पातून पाण्याचा विसर्गही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणाचे एकूण 15 दरवाजांपैकी 13 दरवाजे 0.50 मीटरने उघडलेले आहे. त्यातून 22062 क्युसेक्स विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर प्रकल्पाच्या 14 मुख्यद्वारातून 25638 क्युसेक्स विसर्ग पुर्णा नदीपात्रात सुरु आहे. तसेच येलदरी प्रकल्प सांडव्याच्या 10 मुख्यद्वारांमधून 29480व विद्युत निर्मिती केंद्रातून 2700 असा 32180 क्युसेक्स विसर्ग पुर्णा नदीपात्रात सुरू आहे. तिन्ही धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;