महायुती सरकारकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक, यापूर्वीच्या मदतीतले 30 टक्केही पोहोचले नाहीत

महायुती सरकारकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक, यापूर्वीच्या मदतीतले 30 टक्केही पोहोचले नाहीत

राज्यात यंदा जून ते सप्टेंबर कालावधीतील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरकारने 2236 कोटी रुपये नुकतेच जाहीर केले, पण त्यापूर्वीच्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी 13 हजार 819 कोटी रुपयांची मदत सरकारने घोषित केली होती. परंतु त्यातील 30 टक्केही रक्कम शेतकऱयांच्या खात्यात जमा झाली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करून पाहणी केली. त्यावेळी एका शेतकऱयाने त्यांना यापूर्वीची मदत अद्याप जमा झाली नसल्याचे सांगितले. त्या शेतकऱ्याला अजित पवार यांनी दमदाटी केली होती. त्यावरून शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

दानवे यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर पोस्ट करून यापूर्वी सरकारने जाहीर केलेल्या मदतीचे आकडेच दिले आहेत. मार्च 2023 ते ऑगस्ट 2024 दरम्यानचे ते आकडे आहेत. अवकाळी, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, वादळी वारा व गारपीठ, सततचा पाऊस आदी नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱयांसाठी मदत देण्यास त्या निधीची तरतूद करण्यात आली होती, परंतु त्यातील 30 टक्के रक्कमही शेतकऱयांपर्यंत पोहोचलेली नाही असा आरोप दानवे यांनी केला आहे. यातील किती रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात गेली हे सरकारने पत्रकार परिषद घेऊन सांगावे असे आव्हानही त्यांनी दिले.

घोषणासम्राट शिंदेंनी माहिती द्यावी – दानवे

अंबादास दानवे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. घोषणासम्राट आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काळातील या घोषणांवर प्राधान्याने बोलायला हवे, नुसतं जाकीट घालून बोटतून हिंडून होत नसतं, असा खोचक टोला दानवे यांनी लगावला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;