जिंदाल आणि आंग्रे पोर्टची ओव्हरलोड वाहतूक! जयगड-हातखंबा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

जिंदाल आणि आंग्रे पोर्टची ओव्हरलोड वाहतूक! जयगड-हातखंबा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

मागील काही महिन्यात जयगड ते हातखंबा या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अपघातात अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. जयगड ते हातखंबा रस्त्यावरून जेएसडब्ल्यू पोर्ट आणि आंग्रे पोर्ट या कंपन्यांची वाहतूक सुरू आहे. या कंपन्याच्या ओव्हलोड आणि अनियंत्रित वेगवान वाहतुकीमुळे अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशाच एका अपघातात 20 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने अशा अनियंत्रित आणि ओव्हरलोड वाहतुकीविरोधात पुढील आठवड्यापर्यंत कडक पावले उचलली नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रथमेश गवाणकर यांनी दिला आहे. संस्थेच्या वतीने नायब तहसीलदारांना आज निवेदन देण्यात आले आहे.

खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेने दिलेल्या निवेदनात 2005 पासून जयगड परिसरात जेएसडब्ल्यू पोर्ट आणि आंग्रे पोर्ट यांच्या माध्यमातून या रस्त्यावरून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरवात झाली. सुरवातीला या दोन्ही पोर्टची व्याप्ती कमी प्रमाणात असल्यामुळे फारसा त्रास जाणवत नव्हता. मात्र मागील 10 वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल वाहतूक सुरू आहे. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक, खराब रस्ते व चालकांचा अनियंत्रित वेग यामुळे या रस्त्यावर महिन्यातून किमान एका तरी निष्पाप नागरिकाचा बळी जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावर प्रशासनाकडून मात्र कोणतीही ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. या रस्त्यावर अनेक शाळा, महाविद्यालये देखील आहेत. त्यामुळे या शाळेत महाविद्यालयामध्ये येणारे पालक देखील चिंतेत आहेत. अनेकदा या रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या बंद पडलेल्या वाहनांमुळे वाहतूक ठप्प असते. एकंदरीत या सर्व कारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. प्रशासनाने गांभीर्याने या बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पुढील आठ दिवसात योग्य ती कार्यवाही, उपयोजना झाली नाही तर या तालुक्यातील जनता हजारोंच्या संख्येने रस्तावर उतरेल. तसेच जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत या रस्तावर कोणतीही मालवाहतूक होणार नाही. याला जबादार प्रशासनातील संबंधित विभाग असतील, असा निर्वाणीचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;