लेहमध्ये Gen Z ना रस्त्यावर उतरत आंदोलन करण्याची वेळ का आली, याचा विश्वगुरुंनी विचार करावा – संजय राऊत

लेहमध्ये Gen Z ना रस्त्यावर उतरत आंदोलन करण्याची वेळ का आली, याचा विश्वगुरुंनी विचार करावा – संजय राऊत

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, ते पाळण्या आले नाही. त्यामुळे तेथील Gen Z ना रस्त्यावर उतरत आंदोलन करावे लागले, असे शिवसेना (उद्धव बाळासेहब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. सरकारला देशाचा सीमाभाग शांत ठेवता येत नसेल, तर ते सरकारचे अपयश आहे, असा घणाघात त्यांनी केला. तसेच शेजारी चीन असून तो लडाखमध्ये घसखोरी करत आहे, हे विश्वगुरुंना कोणातरी सांगण्याची गरज आहे, असे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला.

लडाख-लेह हा देशाच्या सीमेवरचा भाग आहे. जर सीमाभागातील लोकांच्या मागण्या मान्य करता येत नसतील, सीमाभाग यांना शांत ठेवता येत नसेल, तर ते स्वतःला विश्वगुरू कसे म्हणवतात. जनतेला दिलेली आश्वासने मोदी यांनी पाळली नाहीत. कलम 370 हटवल्यानंतर लेह लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली होती. अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली होती, ही वेळ देशावर का आली, याचा विश्वगुरुंनी विचार करण्याची गरज आहे.

आश्वासने पूर्ण केली नसल्याच्या विरोधात Gen Z रस्तायवर उतरले आहेत आणि भाजपवाले पळून गेले. तिथे आंदोलनावर बंदी घालण्यात आली आहे. हिंदुस्थानच्या या सीमाभागाजवळ चीन आहे आणि चीन लडाखमध्ये घुसला आहे, याकडे विश्वगुरुंनी लक्ष द्यावे. देशाच्या सीमाभागातील राज्य शांत ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सोनम वांगचूक यांच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता या भागासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी तब्बल 16 दिवस उपोषण केले आहे. मात्र, सरकारकडून कोणीही तिथे जायला तयार नाही, हा निर्दयीपणा आहे. अनेक राज्यात सरकारविरोधात असंतोष आहे. जनतेचा असंतोष उफाळून आला तर यात काय चुकले? ही लोकशाही आहे, त्यांच्या अत्याचार, भ्रष्टाचार, दडपशाही, दरोडेखोरी सहन का करायचे? असा सवालही त्यांनी केला. लेड लखाडच्या जनतेच्या मागण्यांना देशातील जनतेचा पाठिंबा आहे, असेही त्यांनी परखडपणे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;