Beed News – ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार रुपये तातडीने मदत द्या, कर्जमाफी द्या…; सरकार विरोधात शेतकर्यांचा आक्रोश
अतिवृष्टीने बीड जिल्ह्याला झोडपून काढले. पूर परिस्थिती निर्माण झाली. पिके, शेत पाण्यात बुडाले. पिके वाहून गेली, शेती खरडून निघाली. जमिनीत मातीऐवजी शेवाळ राहिले. शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर असताना सरकारने धीर आणि दिलासा देण्याऐवजी हतबल शेतकर्यांची चेष्टा करण्याचे काम केले. नुकसान लाखोचे आणि सरकारची मदत सात-आठ हजार टिकल्यांची. यामुळे अचानक शेतकर्यांमध्ये संताप झाला आणि जरूड फाट्यावर ठिय्या मांडत आक्रोश व्यक्त केला.
अतिवृष्टी आणि पुराने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारकडून शेतकर्यांना मोठी अपेक्षा होती. सरकार मदतीचा हात देईल, असा विश्वास असताना राज्य सरकारने शेतकर्यांची घोर निराशा केली. सात हजार रुपये देवून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याने बळीराजा संतप्त झाला आहे. असंख्य गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून आक्रोश व्यक्त केला. जरूड फाट्यावर निदर्शने करत हजारो शेतकर्यांनी प्रशासनाला जाब विचारला. हेक्टरी ५० हजार रूपये तातडीने मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी द्या, कांद्याच्या पिकाला वेगळी नुकसान भरपाई द्या, अशा मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List