राज्याला 2 बिनकामाचे उपमुख्यमंत्री; पण सरकार दरबारी जनतेचा आक्रोश पोहोचवणारा विरोधी पक्षनेता नाही! संजय राऊत कडाडले

राज्याला 2 बिनकामाचे उपमुख्यमंत्री; पण सरकार दरबारी जनतेचा आक्रोश पोहोचवणारा विरोधी पक्षनेता नाही! संजय राऊत कडाडले

मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळत असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाही. जनतेचा आक्रोश सरकार दरबारी पोहोचवण्याचे काम विरोधी पक्ष नेता करत असतो. राज्याला दोन-दोन बिनकामाचे उपमुख्यमंत्री मिळाले आहेत पण विरोधी पक्ष नेता नाही, ही लोकशाही साठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या सरकारने विरोधी पक्ष नेता ठेवला नाही. विधानसभेत देत नाही आणि विधान परिषदेत सुद्धा नेमू दिला नाही. अशा संकट समयी जनतेचा आवाज म्हणून सरकारला मार्गदर्शन करण्याचे काम विरोधी पक्षाचा नेता करतो आणि त्यातून सरकारला दिशा मिळते. कारण सरकार बरोबर विरोधी पक्षनेता सुद्धा अशा संकटाच्या जागी फिरत असतो, लोकांची मतं समजून घेतो, दु:ख समजून घेतो आणि त्यानंतर तो आपली भूमिका मांडतो. त्यातून सरकारला दिशा मिळते. पण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी लोकशाहीविरुद्ध कट केला आहे. तिघांनी महाराष्ट्राच्या जनतेविरुद्ध कारस्थान केलेले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर जाणार; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार, संजय राऊत यांनी दिली माहिती

विरोधी पक्षनेते पद नसणे हा या राज्याच्या जनतेचा आक्रोश दडपण्याचा प्रयत्न आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी असे विधिमंडळात तीनही प्रमुख पक्षांनी कळवले आहे. विधान परिषदेमध्ये सुद्धा अंबादास दानवे निवृत्त झाल्यावर काँग्रेसच्या नेतृत्वाने सगळ्यांच्या संमतीने एक नाव कळवलेले आहे, पण त्यांनाही नेमले जात नाही. याचा अर्थ काय समजायचा? असा सवाल राऊत यांनी केला.

लोकशाहीच्या गप्पा मारता, स्वातंत्र्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संसद, विधानसभा यावर प्रवचण झोडता. पण ज्या राज्यातून घटनातज्ज्ञ बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले तिथे जनतेचा वतीने आवाज उठवणारा विरोधी पक्षनेता ठेवला नाही. तुम्ही जनतेला काय मदत करणार? असेही राऊत म्हणाले. तसेच तीन पक्षांमध्ये आपापसात साठमारी सुरू आहे. अधिकारी सरकार चालवत आहेत. अधिकाऱ्यांनी निदान अशा प्रसंगी माणुसकी दाखवावी. पण अधिकारी काय कारणार, कारण तिजोरीत पैसेच नाहीत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त डोक्याला हात लावून बसले आहेत.

मिंध्यासारखे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या दाढीचे, चेहऱ्याचे फोटो टाकून मदत देत आहेत. सरकारची मदत आहे, मग महाराष्ट्र सरकार म्हणा. तुमच्याकडे किंवा फडणवीस यांच्याकडे इतका प्रचंड पैसा वाहत चालला आहे का पुरासारखा? ज्यामुळे तुम्ही तुमचे फोटो टाकून मदत देताहेत. माणसं मरताहेत, गुरं-ढोरं वाहून चालली आहेत आणि इथे सुद्धा अमानुष राजकारण करताहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;