Latur News – अतिवृष्टीच्या संकटामुळे चेरा येथे शेतकर्‍याने जीवन संपवले

Latur News – अतिवृष्टीच्या संकटामुळे चेरा येथे शेतकर्‍याने जीवन संपवले

अतिवृष्टी शेतकर्‍यांची पाठ सोडत नसल्याने जळकोट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसामुळे उभी पिकं नष्ट झाली. या नुकसानीमुळे मनोबल खचल्याने चेरा (ता. जळकोट) येथील उत्तमराव रामराव माने (49) या शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वांजरवाडा येथे पाठवला. घटनेचा पुढील तपास सुरू आहे

मयत शेतकरी उत्तमराव माने यांना चेरा येथे गट नंबर 328 व 329 मध्ये 69 आर एवढी जमीन आहे. शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. माने यांनी उसनवारी करून आणि कर्ज काढून शेती केली. पण पेरलेली पिके अतिवृष्टीने उद्ध्वस्त केली. महिना-दीड महिना झाला तरी अतिवृष्टी थांबायचे नावच घेत नाही. त्यामुळे शेतीचे उत्पन्न तर दूरच शेतालाही जाता येईना. त्यामुळे उद्विग्न झालेले शेतकरी उत्तमराव माने यांनी मंगळवारी सकाळी 4.45 वाजता त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;