कोकण रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीवरील 40 टक्के अधिभार रद्द करा; रेल्वेमंत्र्यांना साकडे

कोकण रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीवरील 40 टक्के अधिभार रद्द करा; रेल्वेमंत्र्यांना साकडे

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना संपूर्ण वर्षभर गर्दीत प्रवास करावा लागत आहे. प्रवासी संख्येच्या तुलनेत गाड्या चालवल्या जात नसल्याने प्रवाशांचे हाल ‘जैसे थे’ आहेत. अशा परिस्थितीत कोकण रेल्वेच्या प्रवाशांवर 40 टक्के अधिभाराचा भार कायम आहे. देशातील इतर प्रवाशांच्या तुलनेत समान अंतर असतानाही कोकण रेल्वेच्या प्रवाशांना 40 टक्के जास्तीचे भाडे द्यावे लागत आहे. प्रवाशांवरील वाढीव भाड्याचा भार हलका करण्यासाठी प्रवासी वाहतुकीवरील 40 टक्के अधिभार तातडीने रद्द करा, अशी विनंती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना करण्यात आली आहे. यासंदर्भात कोकण विकास समितीमार्फत रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून म्हणजे 1992-93 पासून प्रवासी वाहतुकीसाठी 40 टक्के आणि मालवाहतुकीसाठी 50 टक्के अधिभार लागू आहे. बांधकाम खर्च अधिक असल्यामुळे हा अधिभार लावला असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. परंतु, आता 33 वर्षे उलटून गेल्यानंतरही अन्याय्यकारक अधिभार ‘जैसे थे’ ठेवण्यात आला आहे. हिंदुस्थानी रेल्वेने काश्मीर, ईशान्य हिंदुस्थान अशा कोकणापेक्षा भौगोलिकदृष्ट्या जास्त कठीण आणि आव्हानात्मक प्रदेशात रेल्वे मार्ग प्रवाशांसाठी सुरू करूनही तिकडे अशाप्रकारचा अधिभार लावलेला नाही. मात्र कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या माथी 40 टक्के अधिभाराचा भार मारला आहे, असे कोकण विकास समितीने म्हटले आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतुकीसाठी लागू असलेला 40 टक्के अधिभार रद्द करण्याची मागणी कोकण विकास समितीतर्फे अध्यक्ष जयवंत दरेकर आणि कार्यकारिणी सदस्य अक्षय महापदी यांनी केली आहे. यासंदर्भात रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्डातील अधिकारी, संबंधित राज्यांचे (महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक) मुख्यमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधींशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;