दोन वर्षांनंतरही रक्तरंजित हिंसाचार सुरूच, मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला; 2 जवान शहीद

दोन वर्षांनंतरही रक्तरंजित हिंसाचार सुरूच, मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला; 2 जवान शहीद

मणिपूरमध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेला रक्तरंजित हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. बिष्णुपूर जिल्हय़ात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आसाम रायफल्सच्या ताफ्याला घेरले आणि अंदाधुंद गोळीबार केला. यात दोन जवान शहीद झाले असून, पाचजण जखमी आहेत. दरम्यान, इम्फाळ विमानतळापासून हे ठिकाण 8 किमीवर आहे. हल्ल्यानंतर मणिपूरमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

बिष्णूपूर जिल्हय़ातील नांबेल सबल लेइकै येथे शुक्रवारी सायंकाळी 5.50 च्या सुमारास भयंकर हल्ला झाला. आसाम रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणारा ट्रक इंफाळहून बिष्णूपुरकडे निघाला होता. महामार्गावर दबा धरून हल्लेखोर लपून बसले होते. हल्लेखोरांनी अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात दोन जवान शहीद झाले तर पाच जण जखमी आहेत. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाईक सुभेदार श्याम गुरूंग आणि रायफलमॅन कश्यप हे शहीद जवानांचे नाव असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

सर्च ऑपरेशन सुरू

या हल्ल्याची जबाबदारी रात्री उशिरापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने घेतली नव्हती. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, निमलष्करी दलाच्या जवानांनी नाकाबंदी केली असून, हल्लेखोरांचे युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरू आहे.

सकाळी रास्ता रोको झाला होता

पोलिसांनी सकाळी एका 45 वर्षीय नागरिकाला अटक केली होती. त्यावेळी हल्ल्याच्या ठिकाणापासून 20 कि.मी.वर मोठा रास्ता रोको झाला होता. त्यानंतर सायंकाळी आसाम रायफल्सच्या ट्रकवर गोळीबार झाला. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का याचा तपास आता सुरू आहे.

पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवडय़ात दौरा केला होता

मे 2023 पासून मणिपुरात रक्तरंजित हिंसाचार सुरू असून, यात किमान 260 नागरिकांचा मृत्यू झाला. तब्बल 28 महिन्यांनंतर 13 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपुरात गेले होते. विकासासाठी शांतता गरजेची आहे, असे ते म्हणाले. मात्र, आज पुन्हा हिंसाचाराचा भडका उडाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;