मुंबईहून अमरावतीला गेलेलं विमान विमानतळावर न उतरताच माघारी परतलं, कारण काय?

मुंबईहून अमरावतीला गेलेलं विमान विमानतळावर न उतरताच माघारी परतलं, कारण काय?

मुंबईहून अमरावतीला गेलेले विमान अमरावती विमानतळावर न उतरताच मुंबईला माघारी परतले. विमान विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र खराब हवामानामुळे अडथळा निर्माण झाला. यामुळे विमानाला मुंबईला परतावे लागले. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याने विमान अमरावती विमानतळावर उतरू शकले नाही. यामुळे विमान पुन्हा मुंबईकडे माघारी वळवावे लागले. विमानाच्या परतीच्या प्रवासामुळे मुंबईहून अमरातीला येणाऱ्या प्रवाशांना पुन्हा मुंबईला यावे लागले. तर अमरावतीहून मुंबईला जाणारी प्रवासी अमरावती विमानतळावर अडकले. हवामानातील बदल आणि तांत्रिक सुविधांचा अभाव यामुळे अमरावती-मुंबई-अमरावती या हवाई सेवेला वारंवार समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांकडून ओला कचरा उचलण्यास नकार देणाऱ्या निर्णयाला अखेर मवाळ भूमिका घेत, ओला कचरा पूर्ववत उचलण्याचा निर्णय...
‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच