भाजपने जनतेचा विश्वास गमावला, ते आता मतचोरी करून सत्तेत आहेत; प्रियांका गांधी यांची टीका

भाजपने जनतेचा विश्वास गमावला, ते आता मतचोरी करून सत्तेत आहेत; प्रियांका गांधी यांची टीका

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बोहारमधील ‘मतदार हक्क यात्रेत’ आज काँग्रेस खासदार प्रियांका गांधी सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. “ज्या पक्षाने जनतेचा विश्वास गमावला, ते आता मतचोरी करून सत्तेत आहेत,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

सुपौल येथे बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत की, भाजपने लोकांचा विश्वास गमावला आहे. आता ते मते चोरून सत्तेत राहू इच्छितात. त्या म्हणाल्या की, एसआयआरच्या नावाखाली लाखो लोकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्या म्हणाल्या, आम्ही गरिबांचा एकही मत चोरू देणार नाही.

तर यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “एनडीएविरुद्धच्या लढाईत आपण सर्वजण एक आहोत आणि निकाल फलदायी ठरतील. आम्ही निवडणूक आयोगाला भाजपच्या इशाऱ्यावर काम करू देणार नाही आणि बिहारमध्ये कोणताही खरा मतदार वगळला जाणार नाही याची खात्री करू.” दरम्यान, राहुल गांधींची ही १६ दिवसांची यात्रा १ सप्टेंबर रोजी पाटण्यातील एका मोठ्या रॅलीने संपेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Breaking News – शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार; दसरा मेळाव्यासाठी मिळाली परवानगी Breaking News – शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार; दसरा मेळाव्यासाठी मिळाली परवानगी
शिवसेनेकडून दरवर्षी मुंबईतील शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. या मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येत शिवसैनिकांसह अनेकजण विचारांचे सोने लुटण्यासाठी येतात....
नेपाळनंतर आता फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध निदर्शने, आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले
…तर राहुल गांधी म्हणतात तसेच पुन्हा वोटचोरीच झाली ना! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
त्यानं नर्तिकेवर जीव ओवाळून टाकला, ती मात्र संपर्कात राहिना; बीडच्या माजी उपसरपंचानं स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवलं
कच्चे केळे खाल्ल्याने आरोग्यासाठी होतील ‘हे’ अद्भुत फायदे
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, राज ठाकरे यांची भेट घेतली
दररोज नाश्त्यात एक वाटी भिजवलेले चणे खाण्याचे शरीराला काय फायदे मिळतील, वाचा