आरक्षण निकालावर माझ्या समाजातील लोकांनीही टीका केली! कोर्टाने जनतेच्या अपेक्षा आणि दबावाखाली निर्णय देऊ नये – सरन्यायाधीश भूषण गवई

आरक्षण निकालावर माझ्या समाजातील लोकांनीही टीका केली! कोर्टाने जनतेच्या अपेक्षा आणि दबावाखाली निर्णय देऊ नये – सरन्यायाधीश भूषण गवई

आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निकालावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. माझ्या समाजातील लोकांनीही माझ्यावर टीका केली. त्यांच्या टीकेचा मी सामना केला. न्यायालयाने खरंतर जनतेच्या अपेक्षा आणि दबावाखाली निर्णय देऊ नये, असे परखड मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले. गोवा हायकोर्ट बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठाने गेल्या वर्षी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत ऐतिहासिक निर्णय दिला. तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पूर्णपीठामध्ये विद्यमान सरन्यायाधीश गवई यांचाही समावेश होता. तो निकाल जाहीर झाल्यानंतर गवई यांच्यावर त्यांच्या समाजातील लोकांनीही टीका केली होती. त्याचा संदर्भ गवई यांनी गोव्यातील भाषणात दिला. न्यायालयाने निर्णय देताना कायद्याची समजूत आणि अंतःकरणावर आधारे निर्णय द्यावा. यावरच माझा नेहमी विश्वास आहे, असे सरन्यायाधीश गवई म्हणाले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाचा लाभ समान प्रमाणात पोहोचलेला नाही. काही मोजक्या जाती जमातींनी आरक्षणाचा लाभ जास्त प्रमाणात घेतला आहे. उर्वरित समाजघटक आरक्षणापासून मोठ्या प्रमाणावर वंचित राहिले आहेत, असे गवई यांनी म्हटले होते. त्यावरून ते टीकेचे धनी बनले होते.

शहरातील मुलाची खेडय़ातील मुलाशी तुलना कशी होणार

सरन्यायाधीशांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर भाष्य केले. मुंबई, दिल्लीतील सर्वोत्तम शाळेत शिकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मुलाची तुलना ग्रामीण भागातील मजूर वा शेतमजुराच्या मुलाशी कशी करता येईल? हा प्रश्न मी स्वतःला विचारला, असे गवई म्हणाले.

 …तर तो समानतेच्या मूलभूत संकल्पनेला तडा

संविधानातील अनुच्छेद 14 अंतर्गत समानतेच्या हक्कावरही सरन्यायाधीशांनी टिप्पणी केली. सर्वांसाठी समानता म्हणजे सर्व समान व्यक्तींतील समानता नव्हे. असमानांना समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी असमान वागणूक देणे हे आपल्या संविधानाचे मूळ तत्त्व आहे. त्यामुळे खेडय़ातील मजुराच्या मुलाची आणि मुंबईतील मुख्य सचिवाच्या मुलाची एकाच निकषावर तुलना करणे हे समानतेच्या मूलभूत संकल्पनेला तडा ठरेल, असेही गवई यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;