मुंबईत पाणी का तुंबले? आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुंबईत पाणी का तुंबले?  आदित्य ठाकरे यांचा सवाल

गेल्या तीन वर्षांपासून मुंबई महानगरपालिका ही निवडून आलेल्या प्रतिनिधींशिवाय थेट सरकारच्या ताब्यात आहे. मात्र निवडणुका नसल्याने जबाबदारी स्वीकारण्यास कुणीही नाही. त्यामुळे मुंबईतील पावसात मुंबईकरांची गैरसोय झाल्यामुळे पालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या, किती नव्या ठिकाणी आणि का पाणी तुंबले, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या उपाययोजनांबाबत ‘एक्स’वर प्रश्न उपस्थित केले आहेत. मे महिन्यात झालेल्या दहा मिनिटांच्या पावसाने अंधेरी सबवे बंद झाला, तर सीप्झ पाण्याखाली गेल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शिवाय अशा वेळी अतिरिक्त आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.

 

फेकनाथ मिंधे यांच्या रस्ते घोटाळय़ामुळे मुंबईच्या रस्त्यांची आता दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की, केवळ पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन फक्त भेटीचे पह्टो टाकण्यात वेळ न घालवता, मुंबईकरांना खऱया प्रश्नांची उत्तरे द्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;