महाराष्ट्रात पालिका निवडणुकांपर्यंत मतदार याद्यांचे पुनरीक्षण नको! राज्य निवडणूक आयोगाची केंद्राला विनंती

महाराष्ट्रात पालिका निवडणुकांपर्यंत मतदार याद्यांचे पुनरीक्षण नको! राज्य निवडणूक आयोगाची केंद्राला विनंती

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणात 65 लाख मतदारांची नावे यादीतून वगळल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत मतदार याद्यांचे पुनरीक्षण राज्यात नको, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.

महाराष्ट्रात 29 महापालिका, 290 नगर पंचायत व नगर परिषद, 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या सर्व संस्थांचा कार्यकाळ संपला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वॉर्ड रचना आणि मतदार यादींचे विभाजन लवकरच सुरू होणार आहे. निवडणूक यंत्रणेवर असलेला कामाचा ताण आणि कर्मचाऱयांचा तुटवडा लक्षात घेता मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया पुढे ढकलण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. यासंदर्भात एक पत्र देत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयामार्फत आपली भूमिका त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहचवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशेष मतदार यादी पुनरिक्षण ही एक अत्यंत विस्तृत प्रक्रिया आहे. यात प्रत्येक मतदाराची प्रत्यक्ष भेट घेऊन, त्याची माहिती पडताळली जाते. ही प्रक्रिया सर्वसाधारणपणे दर 20-25 वर्षांनीच केली जाते. महाराष्ट्रात 2002 मध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण झाले होते.

मोबाईल अॅपद्वारे मतदार पडताळणी

मतदार पडताळणीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एक मोबाईल अॅप विकसित केले आहे. या अॅपद्वारे बीएलओच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन माहितीची पडताळणी केली जाते. मतदारांचे वय पाहून तीन गटांत विभागणी केली जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;