जबाबदारीपासून पळ काढत आहे निवडणूक आयोग, मतचोरीच्या मुद्यावरून गौरव गोगोई यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

जबाबदारीपासून पळ काढत आहे निवडणूक आयोग, मतचोरीच्या मुद्यावरून गौरव गोगोई यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते गौरव गोगोई यांनी सोमवारी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. बिहारमधील मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रिया जलदगतीने आणि जबाबदारीपासून पळ काढत राबवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना गौरव गोगोई म्हणाले, बिहारमधील एसआयआर अभियान सुरू करण्यापूर्वी आयोगाने राजकीय पक्षांशी कोणतीही चर्चा केली नाही. तसेच, 70 लाख नवीन मतदार जोडण्याच्या प्रक्रियेवर आयोगाने मौन बाळगल्याचा आरोप त्यांनी केला. बिहार विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांशी संवाद का साधला नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

गोगोई पुढे म्हणालेकी, बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीनंतर 70 लाख नवीन मतदार कसे जोडले गेले, याबाबत आयोगाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. काही अधिकारी निष्पक्षपणे काम करत नाहीत, हे स्पष्ट आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. लोकशाही बळकट ठेवण्यासाठी मतदानाचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो संविधानाने संरक्षित केला आहे. मात्र निवडणूक आयोग राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यास असमर्थ ठरत आहे, असे गोगोई म्हणाले म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;