मुंबईत पुढील आठ ते दहा तासांसाठी रेड अलर्ट, महत्त्वाचे काम असल्यास घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

मुंबईत पुढील आठ ते दहा तासांसाठी रेड अलर्ट, महत्त्वाचे काम असल्यास घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

गेल्या आठ तासांत मुंबईत 177 मिमी पाऊस पडला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच महत्त्वाचे काम असल्याच बाहेर पडावे असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पुढील तीन दिवस, म्हणजेच 21 ऑगस्टपर्यंत, राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट लागू आहे.

तसेच घ्यावयाच्या खबरदारीविषयी आम्ही चर्चा केली आहे. आमच्या नियंत्रण कक्षातून जिल्ह्यांतील केंद्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुठेही नुकसान झाले असल्यास मदत पुरवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पुढील काही दिवसांत संभाव्य आपत्ती कमी करण्यासाठीही पावले उचलली जात आहेत. शेजारील राज्यांशी मग ते तेलंगणा असो किंवा कर्नाटक, पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीने होण्यासाठी चर्चा सुरू आहे. विशेषतः कोकणात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती उद्भवू नये, याची काळजी घेतली जात आहे.

शेतकऱ्यांनी सुमारे 4 लाख हेक्टर जमिनीवर पिके घेतली होती. त्यांना नुकसान झाले आहे. याचे मूल्यमापन करून मदत केली जाणार आहे. नांदेडमधील मुक्करामाबाद येथे काल 206 मिमी पावसाची नोंद झाली. काल तिथे ढगफुटीची परिस्थिती निर्माण झाली होती, लोक अडकले होते. आतापर्यंत 206 लोकांना वाचविण्यात आले असून अधिक लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफ आणि लष्कराच्या टीम तिथे कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतही जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या 8 तासांत मुंबईत 177 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुढील 8-10 तासांत मुंबईसाठी रेड अलर्ट आहे. त्यामुळे दुपारनंतर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. फक्त अत्यावश्यक काम असल्यासच लोकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत पुढील 2-3 दिवस पावसाची शक्यता आहे. भरतीही येणार आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अलीकडील पावसामुळे 14 ठिकाणी पाणी साचले होते. मात्र 12 ठिकाणी वाहतूक सुरू आहे. मुंबईची रेल्वे सेवा उशिरा चालली असली तरी ती पूर्णपणे थांबलेली नाही असेही फडणवीस यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;