हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेविषयी बढाया मारणं धोकादायक, रघुराम राजन यांचा इशारा

हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेविषयी बढाया मारणं धोकादायक, रघुराम राजन यांचा इशारा

Raghuram Rajan on Indian economy – 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेविषयी जुमलेबाजी करण्यात गर्क आहेत. त्यांनी हिंदुस्थान हा येत्या काळात जगातली तिसरी सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था होईल असा दावा केला आहे. पण, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांनी या बढाया मारणं धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन यांनी हा इशारा दिला आहे. हिंदुस्थानच्या आर्थिक प्रगतीला ज्या प्रकारे वाढवून सांगितलं जात आहे, त्यावर विश्वास ठेवणं ही हिंदुस्थानची सगळ्यात मोठी चूक ठरेल. आपली अर्थव्यवस्था पूर्ण क्षमतेने विकसित करण्यासाठी हिंदुस्थआनला अनेक प्रकारच्या संरचनात्मक समस्यांना आधी सोडवावं लागेल. कारण, ज्या प्रकारे हे सगळं फुगवून सांगितलं जात आहे, त्याला सिद्ध करण्यासाठी पुढची अनेक वर्षं आपल्याला मेहनत करावी लागेल, असं डॉ. राजन म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत जे सरकार निवडून येईल, त्या सरकारसमोर सगळ्यात मोठं आव्हान शिक्षण व्यवस्था आणि कार्यबलात कौशल्य विकासाच्या सुधारणा करणं हेच असणार आहे. या त्रुटी दूर केल्याशिवाय हिंदुस्थानला आपल्या तरुणांच्या क्रयशक्तीचा सुयोग्य लाभ घेता येणार नाही. उलट, क्रयशक्ती असूनही त्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल, असाही इशारा रघुराम राजन यांनी या मुलाखतीदरम्यान दिला.

2047पर्यंत हिंदुस्थानला विकसित देश बनवण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या दाव्यालाही राजन यांनी खोडून काढलं. जर तुमच्या देशातील मुलांकडे शालेय शिक्षण नाही आणि शाळा सोडण्याचा टक्का जास्त असेल तर अशा परिस्थितीत हे लक्ष्य साध्य करण्याविषयी बोलणं निरर्थक आहे, असंही राजन यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;