जर काही चुकीचं झालं असेल तर निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं, राहुल गांधींच्या आरोपांवर अजित पवार यांचे विधान

जर काही चुकीचं झालं असेल तर निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं, राहुल गांधींच्या आरोपांवर अजित पवार यांचे विधान

लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतं चोरली असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्याचे पुरावेही राहुल गांधी यांनी सादर केले होते. त्यावर काही चुकीचे झाले असेल तर निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

अजित पवार म्हणाले की, बारामतीचे उदाहरण घ्या. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात आमच्या उमेदावाराला 48 हजार मतं कमी पडली. पाच महिन्यांनंतर मी विधानसभा निवडणुकीला उभा होतो. त्याच मतदारांनी मला मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिलं. मी काही चुकीचं केलं का? असं नसतं. मी आधीही म्हणालो होतो की आपल्या संविधानानुसार कुठल्याही व्यक्तीला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तो प्रश्न चुकीचा असो वा बरोबर निवडणूक आयोगाने उत्तर देणे अपेक्षित आहे. जर काही चुकीचं आढळलं तर त्यावर आयोगाने कारवाई करणे अपेक्षित आहे असेही अजित पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;