कोल्हापुरात ‘मविआ’चे ‘आत्मक्लेश’, मतचोरीप्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात प्रचंड संताप

कोल्हापुरात ‘मविआ’चे ‘आत्मक्लेश’, मतचोरीप्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात प्रचंड संताप

निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा पर्दाफाश करून त्याचा जाब विचारण्यासाठी निवडणूक आयोग कार्यालयावर धडक देण्यापूर्वीच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह 300हून अधिक खासदारांना अटक केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या वतीने ‘आत्मक्लेश’ आंदोलन करण्यात आले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती स्मारकस्थळी झालेल्या या आंदोलनात ‘निवडणूक आयोग जवाब दो…’, ‘दादागिरी नहीं चलेगी…’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी निवडणूक आयोग कोणाचे बाहुले नसेल तर त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी करण्यात आली.

निवडणूक आयोगाने उत्तरे द्यावीत

‘केंद्र सरकारला या देशात हुकूमशाही आणायची आहे. त्याचा अनुभवसुद्धा येत आहे. त्यात स्वायत्त म्हणवणारी निवडणूक यंत्रणा कोणाचे तरी बाहुले बनल्याने देशातील लोकशाही संपविण्यासाठी असे खटाटोप केले जात आहेत. निवडणुकीत मतचोरी झाल्याचे सर्व पुरावे देऊनही निवडणूक आयोग त्यावर निःपक्षपातीपणे कारवाई करण्याऐवजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडेच शपथपत्र मागत आहे. यातून त्यांना कारवाई करायची नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग जर खरोखरच कोणाचे बाहुले नसेल तर त्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत,’ अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केली.

‘निवडणुकीत ज्या शंका उपस्थित केल्या, त्याला उत्तर देण्याऐवजी केंद्र सरकार व निवडणूक आयोग मुद्दा भरकटवत आहे. जर यंत्रणा पारदर्शी असेल, तर ते उत्तर द्यायला का घाबरत आहेत?’ असा सवाल शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी केला. यावेळी कॉ. दिलीप पवार, चंद्रकांत यादव, सचिन चव्हाण, आर. के. पोवार, उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, भारती पोवार, रवि जाधव, संदीप देसाई, दगडू भास्कर, अनिल घाटगे आदी महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;