भाजपा सत्तेवर असेपर्यंत लोकशाही सुरक्षित नाही
निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असून निवडणुकीत भाजपच्या पदरी अपयश येते तिथे लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. भाजप सरकार सत्तेवर असेपर्यंत देशात खरी लोकशाही सुरक्षित राहणार नाही, असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची केला.
राज्यातील सरकार हे जनतेने निवडून दिलेले सरकार नसून निवडणूक आयोगाने निवडून दिले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आयोगाच्या कार्यपद्धती बाबतीत उपस्थित केलेला मुद्दा काँग्रेस पक्षासाठी किंवा आघाडीसाठी उपस्थित केला नाही तर तो संपूर्ण देशहितासाठी आणि येथील लोकशाही वाचवण्यासाठीच आहे असे चेन्नीथला म्हणाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List