कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे …. शिवसेनेचा बुलढाण्यात ‘जनआक्रोशाचा’ वार !

कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे …. शिवसेनेचा बुलढाण्यात ‘जनआक्रोशाचा’ वार !

महायुती सरकारच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या आणि भ्रष्टाचारी कलंकित मंत्र्यांचा राजीनामाच्या मागणीसाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज “जनआक्रोश आंदोलनाचा वार” बुलढाण्यात करण्यात आला. जिजामाता प्रेक्षगार मैदानाच्या परिसरात धरणे आंदोलनातून, निदर्शनातून भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे.. ही मागणी रेटून धरण्यात आली.

रमी खेळणारे कृषी मंत्री , गृहराज्यमंत्र्यांच्या कुटुंबाचा डान्सबार, पैशांची बॅगा शेजारी ठेऊन घरात बसलेला मंत्री, अघोरी पूजा करणारा मंत्री , सामान्यांना ठोसा मारणारा लोकप्रतिनिधी अशा एकाहून एक प्रतिकात्मक जिवंत देखावे या आंदोलनात सादर करण्यात आले. हे देखावे लक्षवेधक ठरले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी महायुती सरकारच्या विरोधात आपल्या भाषणातून आक्रमक हल्ला चढवला. या आंदोलनाची सुरुवात “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या महाराष्ट्र गीताने झाली. कलापथकांनी सादर केलेल्या “दोन दिवसाची दुनिया पाहू द्या… आमच्या कष्टाचा आम्हाला खाऊ द्या” अशा प्रकारच्या गीतांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. जिल्हाभरातून आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या धरणे आंदोलनात सहभाग घेतला.

सरकारविरुद्धचा लढा सुरूच राहील : आमदार सिद्धार्थ खरात

हे शासन फसवेगिरी करून सत्तेवर आलेले आहे. खोटे आमिष देऊन आलेले आहे. महाराष्ट्रातील मंत्री, आमदार यांनी प्रगती, विकास यावर काम करायच सोडून मंत्री काय करतात हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. कृषी मंत्री कोकाटे रमी खेळतो, मग म्हणतो शासन भिकारी आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राला थोर परंपरा लाभलेली आहे. असं असताना या महाराष्ट्रातील मंत्री कलंक लावण्याचे काम करत आहेत. भ्रष्टाचार करायचा आणि पैसे कमवायचे हाच उद्योग सुरू आहे. या आंदोलनात दाखवलेल्या प्रतिकात्मक देखाव्यांनी मंत्री कसे काम करत आहेत हे पुन्हा एकदा जिवंत झालं. आंदोलनाची ही सुरुवात आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा काम करून हे शेतकरी विरोधी सरकार खाली खेचण्यासाठी आगामी काळात हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असेही आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले.

राज्याची प्रतिमा खराब करण्याचं काम मंत्र्यांनी केले : जयश्री शेळके

आपले महाराष्ट्र राज्य महान आहे हे आपण देशात अभिमानानाने सांगतो. त्याच आपल्या राज्याचे मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकतात, मंत्री आईच्या नावाने डान्सबार चालवतात. कृषी मंत्री ऑनलाईन रमी खेळतात. एक एक कारनामे या सरकारचे बाहेर येत आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार सर्व सामान्य माणसावर “बॉक्सिंग स्कील” दाखवत मारहाण करत, कॅन्टीन केसरी म्हणून मिरवतात. तरी देखील राजीनामे घेतले जात नाहीत. राज्याची प्रतिमा रसळतला नेल्या जात आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. लाडक्या बहिणीच्या निधीला कट लावण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने झोपेच सोंग घेतले असल्याची खरमरीत टीका राज्य प्रवक्ता जयश्री शेळके यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;