मतचोरीचे सत्य देशासमोर आले आहे, आम्ही आमचा अधिकार मिळवणारच! राहुल गांधी यांचा निर्धार
नवी दिल्लीत मतचोरी विरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोर्चाला पोलिसांनी अडवले असून राहुल गांधी, प्रियांका गांधी संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेत त्यांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
आज जब हम चुनाव आयोग से मिलने जा रहे थे, INDIA गठबंधन के सभी सांसदों को रोका गया और हिरासत में ले लिया गया।
वोट चोरी की सच्चाई अब देश के सामने है।
यह लड़ाई राजनीतिक नहीं – यह लोकतंत्र, संविधान और ‘एक व्यक्ति, एक वोट’ के अधिकार की रक्षा की लड़ाई है।
एकजुट विपक्ष और देश का हर… pic.twitter.com/SutmUirCP8
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 11, 2025
यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेणार होतो. मात्र, आम्हाला अडवण्यात आले. निवडणूक आयोग चर्चेला का घाबरत आहे? आज आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार होतो, तेव्हा इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना थांबवण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आले. मत चोरीचे सत्य आता देशासमोर आहे. ही लढाई राजकीय नाही. ही लोकशाही, संविधान आणि ‘एक व्यक्ती, एक मत’ या अधिकाराचे रक्षण करण्यासाठीची लढाई आहे. विरोधी पक्ष आणि देशातील प्रत्येक मतदाराची मागणी आहे स्वच्छ मतदार यादी. आम्ही हा अधिकार कोणत्याही परिस्थितीत मिळवू,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List