निवडणूक आयोगाने देशातली मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक उद्ध्वस्त केली आहे, आदित्य ठाकरे यांची टीका

निवडणूक आयोगाने देशातली मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक उद्ध्वस्त केली आहे, आदित्य ठाकरे यांची टीका

निवडणूक आयोगाकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावण्याचा प्रकार लज्जास्पद आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच निवडणूक आयोगाने देशातली मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक उद्ध्वस्त केली असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, संपूर्ण जग पाहत आहे की निवडणूक आयोगाने भारतातील मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका कशा उद्ध्वस्त केल्या आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावण्याचा आयोगाचा प्रकार लज्जास्पद आहे. निवडणूक आयोगाने स्पष्टपणे भूमिका मांडून राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. निवडणूक आयोग स्वतःला सर्वोच्च न्यायालयापेक्षा वरचं मानत आहे. सर्वोच्च न्यायालयातसुद्धा त्यांनी असे म्हटले आहे की, बिहारमधून ज्या व्यक्तींची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांची यादी ते सादर करणार नाहीत. मग त्यांना मतदानाचा हक्क नाही काय? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;