एका दुर्घटनेवरून एअर इंडियाची बदनामी करू नका, सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

एका दुर्घटनेवरून एअर इंडियाची बदनामी करू नका, सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या सुरक्षा व्यवस्थेची कडक तपासणी करावी आणि पीडितांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एअर इंडियाची बाजू घेत याचिकाकर्त्याच्या हेतूवर संशय घेतला. एका दुर्घटनेवरून एअर इंडियाची बदनामी करू नका, अशी कडक टिप्पणी केली. एका दुर्दैवी प्रसंगानंतर प्रत्येक जण एअर इंडियाविरोधात केस दाखल करू इच्छित आहे. जर सुरक्षा नियमांमध्ये बदल पाहिजे असेल तर फक्त एअर इंडियालाच का लक्ष्य करायचे. अन्य एअरलाइन्सला का सहभागी केले नाही, असा सवाल न्यायालयाने केला.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले, आपल्याला सर्वांना माहीत आहे की ही दुर्दैवी घटना आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही एअर इंडियाला यापद्धतीने बदनाम कराल. कोर्टाने याचिकाकर्त्याला म्हटले की असं वाटायला नको की तुम्ही कुठल्या प्रतिस्पर्धी एअरलाइन्सला सेवा देत आहात. जर तुम्हाला सुरक्षा नियमांमध्ये बदल हवा असेल तर तो सर्व एअरलाइन्ससाठी असायला हवा. फक्त एअर इंडियासाठी नाही. इतर एअरलाइन्सच्या विरोधात का नाही? जर तुम्हाला कोणत्या एअरलाइन्स विरोधात व्यक्तिगत तक्रार असेल तर त्यासाठी ग्राहक मंचात तक्रार करा.

याचिकाकर्त्याच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, माझा एअर इंडियाचा व्यक्तिगत अनुभव चांगला नव्हता. त्यावर कोर्टाने उत्तर दिले की, आम्हीदेखील नियमितरीत्या प्रवास करतो. कोर्टाने सल्ला दिला की, सुरक्षा व्यवस्था आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे हवी असतील तर संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करा. जर कुठल्या अधिकाऱ्याने विचार केला नाही, तर आम्ही बघू.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;