गोडसेबाबतच्या अभिजीत गंगोपाध्याय यांच्या वक्तव्याने जयराम रमेश संतापले; उमेदवारी रद्द करण्याची मागणी

गोडसेबाबतच्या अभिजीत गंगोपाध्याय यांच्या वक्तव्याने जयराम रमेश संतापले; उमेदवारी रद्द करण्याची मागणी

कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि अभिजीत गंगोपाध्याय यांनी पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, आता गंगोपाध्याय महात्मा गांधी आणि नुथराम गोडसे यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे अडचणीत आले आहेत. काँग्रेसने त्यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेत त्यांची लोकसभेची उमेदवारी परत घ्यावी, अशी मागणी भाजपकडे केली आहे.

एका बंगाली वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्याबाबत मत व्यक्त केले होते. मी विधी क्षेत्रातून आलो आहे. प्रत्येक प्रकरणाची दुसरी बाजू असते, ती जाणून घेणे मला महत्त्वाचे वाटते. नथूराम गोडसे यांचे साहित्य वाचून त्यांनी महात्मा गाधींची हत्या करण्याचा निर्णय का घेतला? हे जाणून घेण्याची मला गरज वाटते. तोपर्यंत मी गांधी आणि गोडसे यांच्यापैकी कुणा एकाची निवड करणार नाही. गोडसे यांनी हत्या करण्याचा निर्णय का घेतला? त्या कारणांच्या मुळाशी जायला हवं, असे गंगोपाध्याय यांनी म्हटले होते. अभिजीत गंगोपाध्याय यांच्या या विधानावर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश संतापले आहेत.

रमेश यांनी एक्सवर पोस्ट करत गंगोपाध्याय यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. रमेश म्हणाले की, कलकत्ता उच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश, ज्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. ज्यांना पंतप्रधानांचा थेट आशीर्वाद आहे. तसेच ते भाजपाचे उमेदवार आहेत. अशा व्यक्तीने गांधी किंवा गोडसे यांच्यापैकी एकाची निवड करू शकत नाही, असे म्हणणे संतापजनक आहे. गंगोपाध्याय यांचे विधान आक्षेपार्ह असून त्यांनी महात्मा गांधी यांचा वारसा जपण्यासाठी कोणताही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी जयराम रमेश यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;