यवतमधील जमावबंदीचे आदेश अखेर शिथिल, पाचव्या दिवशी बाजारपेठ पाच तास सुरू

यवतमधील जमावबंदीचे आदेश अखेर शिथिल, पाचव्या दिवशी बाजारपेठ पाच तास सुरू

यवत येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण होऊन तोडफोड आणि जाळपोळीची घटना घडली होती. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले होते. त्यामुळे गावची बाजारपेठ पाच दिवस बंद होती. अखेर यवतमधील जमावबंदीचे आदेश शिथिल करून आज सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यामुळे पाचव्या दिवशी बाजारपेठ सुरू झाली होती. त्यामुळे व्यापारीवर्गाला आणि नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, सकाळी 11 वाजल्यापासून पुन्हा बाजारपेठ बंद करण्यात आली.

यवत पोलिसांनी आत्तापर्यंत 19 जणांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. जमावबंदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेचे वातावरण आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्थेसाठी यवत गावात पोलिसांचा बंदोबस्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत दररोज पाच तास जमावबंदी शिथिल असणार आहे. यवत येथील वातावरण शांत होऊन पूर्ववत बाजारपेठ सुरू होण्याची आशा व्यापारीवर्गाने व्यक्त केली आहे.

कोणीही आपले फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप वगैरे सोशल मीडियावर कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट्स, बॅनर्स, फोटो, टीका-टिप्पणी, मजकूर आदी पोस्ट करू नयेत. एखादी वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर आल्यास ती तत्काळ डिलीट करावी. पुढे फॉरवर्ड करू नये. त्याबाबत पोलीस ठाण्याला तत्काळ कळवावे. एखाद्या आक्षेपार्ह पोस्टमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्याअन्वये योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल. तसेच ग्रुप अॅडमिनलाही त्यात जबाबदार घरण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिला आहे.

सोशल मीडियाचा वापर करताना सर्वांनी सामाजिक सलोखा व सार्वजनिक शांतता अबाधित राहील याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक देशमुख यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;