भाजप कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून राजकीय फायद्यासाठी जैन समाजाच्या भावनांशी खेळत आहे का? आदित्य ठाकरेंनी घेतला खरपूस समाचार

भाजप कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून राजकीय फायद्यासाठी जैन समाजाच्या भावनांशी खेळत आहे का? आदित्य ठाकरेंनी घेतला खरपूस समाचार

भाजप फक्त त्यांच्या राजकीय फायद्यासाठी जैन समाजाच्या भावनांशी खेळत आहे का?, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. दादरमधील कबुतरखान्यावरील मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कारवाईवरून त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी X वर एका पोस्टद्वारे भाजपच्या काही नेत्यांच्या कृतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, “3 जुलै रोजी भाजपच्या एका विधान परिषद सदस्याने मुंबईतील कबुतरखान्ये पाडण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र आता भाजपचेच एक मंत्री ज्यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेला (BMC) आदेश देण्याचा अधिकार आहे, त्यांनी याच कबुतरखान्यांच्या पाडकामाविरोधात बीएमसीला पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे हे मंत्री मंगलप्रभात लोढा, हे मुंबईचे पालकमंत्री देखील आहेत. हा तर निव्वळ विनोद आहे.”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “स्थानिक रहिवाशांच्या भावनांचा, त्यांच्या इच्छेचा विचार केला गेला पाहिजे.” त्यांनी विलेपार्ले येथील जैन देरासरच्या उदाहरणाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “कायद्याचा पूर्ण आदर राखून, मी बीएमसीला कायदेशीर मार्ग शोधून पवित्र स्थळाचे पाडकाम टाळण्यास सांगितले होते. मात्र आता भाजपच्या सरकारच्या काळात बीएमसीने ते देरासर पाडले. त्यावेळी मंत्री लोढा यांनी याचा निषेध केला. मात्र प्रत्यक्षात बीएमसीला ते वाचवण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधण्यास लोढा सांगू शकले असते.”

आदित्य ठाकरे म्हणाले की, “सत्य हे आहे की, जैन समुदायाला भाजप एक खात्रीशीर मतपेढी म्हणून पाहते, निवडणुकीदरम्यान अशा प्रकारे त्यांच्या भावनांशी खेळून मतदानावर काहीच परिणाम होणार नाही, याची भाजला खात्री आहे, म्हणून भाजप जैन समाजाकडे मतपेढी म्हणून बघते. त्यामुळे जैन समाजाने ही राजकीय खेळी ओळखली पाहिजे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;