सत्यपाल मलिक यांनी कुठलीही भीती न बाळगता नेहमी सत्याची बाजू मांडली, आदित्य ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली
जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक जी ह्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे.
सत्यपाल मलिक ह्यांनी कुठलीही भीती न बाळगता नेहमी सत्याची बाजू मांडली, वेळप्रसंगी रोषही पत्करला, पण ते मागे हटले नाहीत.
संघर्षमय कारकीर्दीच्या ह्या लढवय्या नेत्याला भावपूर्ण…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 5, 2025
त्यांच्या निधनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ”जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक जी यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे. सत्यपाल मलिक यांनी कुठलीही भीती न बाळगता नेहमी सत्याची बाजू मांडली, वेळप्रसंगी रोषही पत्करला, पण ते मागे हटले नाहीत. संघर्षमय कारकीर्दीच्या या लढवय्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List