कोल्हारमधील वाहतूककोंडीने भक्तांचा श्वास गुदमरला, समांतर पुलाचे काम रखडले; नागरिकांमधून संताप व्यक्त

कोल्हारमधील वाहतूककोंडीने भक्तांचा श्वास गुदमरला, समांतर पुलाचे काम रखडले; नागरिकांमधून संताप व्यक्त

महाराष्ट्र राज्यास दक्षिणोत्तर जोडणारा सेतू म्हणून ओळखला जाणारा अहिल्यानगर-कोपरगाव रस्ता कोल्हारच्या पुलावर वाहतुकीच्या कोंडीत येऊन पोहचतो. शुक्रवारी रात्रीपासून शनिवार, रविवार तर चक्का जामचा दिवस म्हणून प्रसिद्ध झाला आहे. येथील समांतर पुलाचे काम रखडल्याने आठवड्याचे दोन दिवस चक्का जाम आता कोल्हरकरांच्या पाचवीला पुजला आहे. बांधकाम विभाग आणि सरकार मात्र निद्रावस्थेत असल्याने तीन तीर्थक्षेत्रे असलेल्या या महामार्गावर भक्तांचा श्वास गुदमरत आहे.

अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या डागडुजीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च होत असताना, या रस्त्याचे शुक्लकाष्ठ संपत नाही. दोन ठेकेदार अर्धवट काम सोडून गायब झाले. आता हा राज्य महामार्ग केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली वर्ग केला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागेल, अशी भाबडी समजूत येथील ग्रामस्थांमध्ये दिसत आहे.

शिर्डीला श्री साईबाबा, श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूरचे साडेतीन शक्तिपीठ असणारे भगवती मातेचे मंदिर आणि श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे भक्तांचा ओघ सतत सुरू असतो. परंतु, या रस्त्याने भक्तांची वाट बिकट करून ठेवली आहे. कोल्हारच्या पुलावर तासन्तास वाहतूककोंडी होत असल्याने परराज्यांतून आलेल्या भक्तांसह प्रवास करणारे नागरिकही त्रस्त होत आहेत.

अहिल्यानगर कोपरगाव रस्त्यावर गेल्या पंधरा ते वीस वर्षात अनगणित अपघात होऊन शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांना अपंगत्व आले आहे. अनेक वाहनांचे मोठे नुकसान कोल्हारच्या चहु‌बाजूला वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागतात आणि रस्त्याच्या बाजूला असणारे व्यवसाय ठप्प होतात. त्यामुळे या रस्त्याचे काम कधी होणार? असा प्रश्न पडत आहे.

या रस्त्यावरील अवजड वाहतुकीमुळे रस्त्याच्या दुरवस्थेत भरच पडत आहे. या रस्त्यावर दररोजच नवनवीन खड्डे तयार होत असल्याने, या रस्त्याची चाळण झाली आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याने आणि हा रस्ता पूर्णत्वास जात नसल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण

झाले. मात्र, या रस्त्याच्या कामास मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे आणखी किती निष्पाप नागरिकांचा बळी राज्य सरकार, बांधकाम विभाग आणि आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण घेणार असा प्रश्न नागरिक व भक्तगण विचारीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;