16 व्या वर्षांपर्यंत कुठलीच परीक्षा नाही, फिनलंड सरकारचा निर्णय

16 व्या वर्षांपर्यंत कुठलीच परीक्षा नाही, फिनलंड सरकारचा निर्णय

फिनलंडमधल्या शिक्षणपद्धतीचे जगभरात कौतुक केले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फिनलंडमध्ये विद्यार्थ्यांना 16 वर्षांपर्यंत कोणतीही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा द्यावी लागत नाही. दुसरीकडे हिंदुस्थान सारख्या देशात दहावी आणि बारावीला बोर्ड परीक्षा अनिवार्य आहे. फिनलंडमध्ये फक्त उच्च माध्यमिक शिक्षण (इयत्ता 10 वी ते 12 वी) पूर्ण केल्यानंतर ‘मॅट्रिक्युलेशन परीक्षा’ घेतली जाते, जी कॉलेज किंवा विद्यापीठ प्रवेशासाठी असते. फिनलंडमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यांकन त्यांना मिळालेल्या अभिप्राय आणि दिलेल्या प्रोत्साहनाच्या माध्यमातून केले जाते.

फिनलंडमध्ये औपचारिक शिक्षणाची सुरुवात मुलांच्या 7 व्या वर्षी होते. त्याआधी 0 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी ‘अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर’ (ECEC) प्रणाली राबवली जाते. ही प्रणाली स्थानिक प्रशासनाद्वारे चालवली जाते आणि मुलांना परीक्षेच्या तयारीऐवजी त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. या सेवेचा खर्च कुटुंबाच्या उत्पन्नावर आणि मुलांची संख्येवर अवलंबून असतो.

या नऊ वर्षांत मुलांना लागणारी जीवनकौशल्ये आणि सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. बहुतांश मुलं आपल्या घराजवळील शाळांमध्ये शिकतात, जरी काही अटींसह इतर शाळांमध्ये प्रवेश घेण्याची संधीही असते.

प्राथमिक शिक्षणानंतर विद्यार्थी सामान्य शिक्षण किंवा व्यवसायिक प्रशिक्षण यामधून एक पर्याय निवडू शकतात. हे दोन्ही अभ्यासक्रम साधारणपणे 3 वर्षांचे असतात आणि उच्च शिक्षणासाठी पात्र असतात. व्यवसायिक प्रशिक्षण विशेषतः तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि वाहतूक यांसारख्या क्षेत्रांमध्ये लोकप्रिय असून ४० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी हाच पर्याय निवडतात.

सैद्धांतिक विषयांमधील गुणांवर मुलांना प्रवेश दिला जातो. तर काही अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश किंवा योग्यतेच्या चाचण्यांचा वापर केला जातो. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच कठीण राष्ट्रीय परीक्षांनी विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याऐवजी, फिनलंडमध्ये मुलांच्या वैयक्तिक विकासावर आणि जीवनकौशल्यांवर भर देण्याचा प्रयत्न केला जातो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;