ममता बॅनर्जी यांची पक्षाच्या खासदारांसोबत बैठक; तृणमूलची पुढची रणनीती ठरली

ममता बॅनर्जी यांची पक्षाच्या खासदारांसोबत बैठक; तृणमूलची पुढची रणनीती ठरली

पश्चिम बंदालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. तसेच निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची रणनीती ठरवण्यात येत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांना महत्त्वाची जबाबदारी दिली असून त्यांची लोकसभेतील पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती केली आहे. आता अभिषेक बॅनर्जी हे ज्येष्ठ खासदार सुदीप बॅनर्जी यांची जागा घेतील, ज्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे, असं सांगण्यात येत आहे.

ते लोकसभेत पक्षाचे नेतृत्व बळकट करतील आणि इंडिया आघाडीत त्यांच्या पक्षासाठी समन्वयाचे काम करतील. ममता बॅनर्जी यांनी खासदारांसोबतच्या 12 मिनिटांच्या बैठकीत ही घोषणा केली आणि पक्षची पुढील रणनीती ठरवण्यात आली आहे. दिल्लीत बंगाल आणि त्याच्या सत्ताधारी पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे अशा काळात परिपक्व नेत्याची गरज आहे जो सुसंगत असेल आणि पक्षाची दिशा ठरवू शकेल. त्यामुळे अभिषेक यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बंगाल आणि राज्यातील लोकांशी संबंधित मुद्द्यांवर विशेष लक्ष देऊन अभिषेक राष्ट्रीय राजकारणावर लक्ष केंद्रित करतील अशी अपेक्षा आहे.

ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक यांनात्यांचे राजकीय वारस म्हणून पाहिले जाते. आता त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांनी कल्याण बंदोपाध्याय यांच्या भूमिकेवर टीका केली. तेव्हा या ज्येष्ठ नेत्याने राजीनामा दिला आहे. या घडामोडींमुळे अखेर सुदीप बॅनर्जी यांना लोकसभा पदावरून काढून टाकण्याची घोषणा पक्षाने केली.

कल्याण बॅनर्जी यांनी नंतर प्रसारमाध्यमांना सांगितले की, खासदारांमधील समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप त्यांच्यावर होणे अयोग्य आहे. मी लोकसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाचा राजीनामा दिला आहे कारण ‘दीदी’ यांनी व्हर्च्युअल बैठकीत म्हटले होते की पक्षाच्या खासदारांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे दोष माझ्यावर आहे. त्यामुळेच मी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. ज्यांना ममता बॅनर्जींनी खासदार बनवले ते लोकसभेतही येत नाहीत. दक्षिण कोलकाता, बराकपूर, बांकुरा, उत्तर कोलकाता… संसदेत फारसे कोणी उपस्थित राहत नाही. मी काय करू शकतो? माझी चूक काय? प्रत्येक गोष्टीसाठी मला दोष दिला जात आहे,” असे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;