IND vs ENG ओव्हलवर मियांभाईची जादू चालली, इंग्लंडवर 6 धावांनी थरारक विजय; सिराजच्या ‘पंच’मुळे मालिका बरोबरीत

IND vs ENG ओव्हलवर मियांभाईची जादू चालली, इंग्लंडवर 6 धावांनी थरारक विजय; सिराजच्या ‘पंच’मुळे मालिका बरोबरीत

अखेरपर्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने सहा धावा राखून यजमान इंग्लंडचा पराभव केला आहे. हा सामना जिंकत टीम इंडियाने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. मोहम्मद सिराजने पाच विकेट तर प्रसिद्ध क्रिष्णाने चार विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

पहिल्या चार कसोटी सामन्यातील दोन सामने इंग्लंडने जिंकले होते, एक सामना टीम इंडियाने व एक सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे ही मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणे गरजेचेच होते. टीम इंडियासाठी करो की मरो असलेल्या या सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. त्यामुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला चांगला खेळ करता आला नाही. 224 धावात टीम इंडियाचे सर्व खेळाडून तंबूत परतले . त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची देखील सारखीच परिस्थिती होती. इंग्लंडने दहा गडी गमावत 247 धावा केल्या व टीम इंडियावर 23 धावांची आघाडी घेतली.

त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाच्या संघाने यशस्वी जैस्वालच्या 118 धावांच्या जोरावर 396 धावांपर्यंच मजल गाठली. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 373 धावांचे लक्ष्य दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाचे पहिले तीन फलंदाज शंभर धावांपर्यंत बाद झाले. मात्र त्यानंतर मैदानावर आलेल्या हॅरी ब्रुक व जॅकॉब बेथेल यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या नाकी नाऊ आणले. दोघांनी मिळून तब्बल 195 धावांची भागिदारी केली. इंग्लंडसाठी अगदी विजयाच्या टप्प्यात असतानाच आकाशदीपने हॅरी ब्रुकला माघारी पाठवले. त्यानंतरही जॅकॉब संघाला विजय मिळवून देईल अशी आशा होती. मात्र प्रसिद्धने त्याचा काटा काढत टीम इंडियाचा विजयाच्या दिशेचा मार्ग सुकर केला. त्यानंतर अवघ्या 35 धावात इंग्लडच्या तीन फलंदाजांना सिराजने बाद केले व सामना टीम इंडियाच्या नावे केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;