लोकसभेला यश मिळाल्यानंतर विधानसभेत आम्ही गाफील राहिलो, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची कबुली

लोकसभेला यश मिळाल्यानंतर विधानसभेत आम्ही गाफील राहिलो, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची कबुली

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार आलं की ही योजना बंद होणार असा भिती जनतेच्या मनात महायुतीच्या नेत्यांनी निर्माण केली होती असे विधान काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले आहे. तसेच लोकसभेला यश मिळाल्यानंतर विधानसभेत आम्ही गाफील राहिलो अशी कबुली काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली.

सकाळ समुहाला दिलेल्या एका मुलाखातीत सतेज पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आम्हाला यश मिळालं. लोकसभेला एक नरेटिव्ह राहुल गांधी यांनी सेट केला होता. आणि लोकांपर्यंत त्यांनी वस्तूस्थिती नेली होती. भाजप कशा पद्धतीने आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवर अतिक्रमण करत आहे हे भाजपच्या अनेक नेत्यांच्या विधानावरून सिद्ध झालं होतं. भारत जोडे यात्रेनिमित्र एक चांगलं वातावरण निर्माण झालं होतं. पण विधानसभा निवडणुकीत तिनही पक्षांनी फार वेळ घालवला. आधी जागावाटपाचा अकडा ठरवून पुढे जायला हवं होतं. त्या बैठकीला मीही होतो, त्यामुळे एकमेकांवर बोट दाखवण्यापेक्षा यासाठी आम्ही सगळे जबाबदार आहोत असे पाटील म्हणाले.

तसेच हा निर्णय कदाचित लवकर झाला असता आणि लोकांशी संवाद साधता आला असता. विधानसभा निवडणुकीत आम्ही थोडे गाफील राहिलो. लोकसभेला आम्हाला यश मिळाले आहे तर विधानसभेत आमचा 100 टक्के विजय निश्चित आहे या मनःस्थितीत आम्ही होतो. हरयाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीची वेळ बदलण्यात आली. आम्ही त्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयात जायला हवं होतं. हरयाणासोबतच महाराष्ट्राची निवडणूक घ्या अशी मागणी करायला हवी होती. पण असे न होता याचा फायदा महायुती सरकारने घेतला, निवडणूक पुढे ढकलली. लाडकी बहीण योजना आणली. आणि पुढच्या तीन महिन्यांचे पैसे दिले गेले. असं कधी झालं नाही. कायदा, नियम मोडून डिसेंबरपर्यंत पैसे देण्यात आले. एका कुटुंबाच्या खात्यात 50 हजार रुपये आले होते. शेतकरी सन्मान योजना, राजील गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे एकदम आले होते. सरकारी पैश्यांवर लाडकी बहीण योजनेते मेळावे घेण्यात आले होते. महाविकास आघाडीचं सरकार आलं की ही योजना बंद होणार असा भिती जनतेच्या मनात त्यांनी निर्माण केली असेही सतेज पाटील म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;