IND Vs ENG 5th Test – असं झालं तर टीम इंडियाचा विजय जवळपास निश्चित! मालिका अनिर्णित सुटणार?

IND Vs ENG 5th Test – असं झालं तर टीम इंडियाचा विजय जवळपास निश्चित! मालिका अनिर्णित सुटणार?

ओव्हलमध्ये सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने चांगली पकड निर्माण केली आहे. टीम इंडियाचा पहिला डाव 224 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाची वादळी सुरूवात केली होती. परंतु त्यांच्या वादळाला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ब्रेक लावला आणि इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून आतापर्यंत 259 धावांची आघाडी घेतली आहे.

ओव्हल मैदानाचा विचार केला तर, या मैदानावर 263 हून अधिका धावांच्या आव्हानाचा कोणत्याच संघाला पाठलाग करता आलेला नाही. 1902 साली इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 263 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला होता. त्यानंतर 1963 साली वेस्ट इंडिजने 253 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. मात्र त्यानंतर कोणत्याच संघाला 250 हून अधिक धावांचा पाठलाग करण्यात या मैदानावर यश आलेलं नाही. त्यामुळे टीम इंडियाने जर 300 हून अधिक धावांच आव्हान दिलं तर, टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवित होतील. सध्या टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 278 धावा करत 259 धावांची आघाडी घेतली आहे. रविंद्र जडेजा (24*) आणि ध्रुव जुरेल (05*) खेळत आहेत.

IND Vs ENG 5th Test – गोलंदाजीने नाही तर पठ्ठ्याने फलंदाजीने केलीये कमाल, आकाश दीपने इंग्लंडची शाळा घेतली

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मधुमेह होईल दूर, ‘ही’ 10 योगासनं नियमित करून शरीर ठेवा निरोगी मधुमेह होईल दूर, ‘ही’ 10 योगासनं नियमित करून शरीर ठेवा निरोगी
योगाचं महत्त्व आता फक्त प्राचीन ज्ञान म्हणून मर्यादित राहिलेलं नाही, तर आधुनिक विज्ञानानेही त्याला मान्यता दिली आहे. नुकत्याच भारतात झालेल्या...
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं… संजय शिरसाट यांचं वादग्रस्त वक्तव्य
IND Vs ENG 5th Test – टीम इंडियाचा दुसरा डाव संपुष्टात, इंग्लंडला जिंकण्यासाठी 374 धावांच आव्हान
वडिलांचं नाव फादर, आईचं नाव इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया; मतदार यादीतला अजब प्रकार पाहून मतदार गोंधळले
कमी की जास्त झोप घेणारी? कोणती मुले हुशार असतात? ‘हे’ आहे तज्ज्ञांचे उत्तर
Mumbai News – बोरीवली स्थानकात प्रवासी आणि टीसीमध्ये राडा, मुजोर तरुणाकडून स्टेशन मास्तर कार्यालयात तोडफोड
सरन्यायाधीश साहेब, दैनिक ‘सामना’त आज प्रसिद्ध झालेला अग्रलेख अवलोकनार्थ पाठवत आहे; संजय राऊत यांचे भूषण गवईंना पत्र