लोकसभा निवडणुकीत 70 ते 80 जागांवर गडबड घोटाळा, निवडणूक आयोग मेलाय; राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

लोकसभा निवडणुकीत 70 ते 80 जागांवर गडबड घोटाळा, निवडणूक आयोग मेलाय; राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

आपल्या देशाचा निवडणूक आयोग मेलाय, लोकसभा निवडणूकीत 70 ते 80 जागांवर घोटाळा झालाय व तो येत्या काही दिवसात आम्ही सिद्ध करून दाखवू, असा घणाघात काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. नवी दिल्ली येथे काँग्रेसचे वार्षिक लिगल कॉनक्लेव्ह 2025 सुरू आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोग व मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

”आपल्या देशाची निवडणूक यंत्रणा मेलीय. लोकसभा निवडणूकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फारच कमी मेजॉरिटीने पंतप्रधान झाले आहेत. 10 ते 15 जागांवर फसवणूक झाली असे बोलले जाते, पण आम्हाला तर असं वाटतं की 70 ते 80 जागांवर फसवणूक झाली आहे. जर आताही दहा ते बारा जागा इथे तिथे झाल्या तर मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत”, असे ते म्हणाले.

निवडणूकीत घोटाळा सिद्ध करणार

लोकसभा निवडणूकीत कशा प्रकारे घोटाळा झाला ते दाखवून देणार असल्याचे यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले. ”आम्ही पुढच्या काही दिवसात जनतेला दाखवून देऊ की लोकसभा निवडणूकीत कशाप्रकारे घोटाळा झाला आहे. आम्ही ते सिद्ध करणार आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.

राजा ही संकल्पना अमान्य

राहुल गांधी हे भाषणासाठी उभे राहताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी हमारा नेता कैसा हो, अशा घोषणा दिल्या. त्यावेळी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना रोखलं व ते म्हणाले की, मी राजा नाही, मला राजा बनायचं देखील नाही. मी या राजा संकल्पनेच्याच विरोध आहे असे म्हणत त्यांनी एक प्रकारे हुकुमशाहीला विरोध केला असे सांगितले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं… संजय शिरसाट यांचं वादग्रस्त वक्तव्य सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं… संजय शिरसाट यांचं वादग्रस्त वक्तव्य
महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अकोला येथील एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ”वसतीगृहासाठी वाटेल तितके...
IND Vs ENG 5th Test – टीम इंडियाचा दुसरा डाव संपुष्टात, इंग्लंडला जिंकण्यासाठी 374 धावांच आव्हान
वडिलांचं नाव फादर, आईचं नाव इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया; मतदार यादीतला अजब प्रकार पाहून मतदार गोंधळले
कमी की जास्त झोप घेणारी? कोणती मुले हुशार असतात? ‘हे’ आहे तज्ज्ञांचे उत्तर
Mumbai News – बोरीवली स्थानकात प्रवासी आणि टीसीमध्ये राडा, मुजोर तरुणाकडून स्टेशन मास्तर कार्यालयात तोडफोड
सरन्यायाधीश साहेब, दैनिक ‘सामना’त आज प्रसिद्ध झालेला अग्रलेख अवलोकनार्थ पाठवत आहे; संजय राऊत यांचे भूषण गवईंना पत्र
Ratnagiri News – मैत्रीणीशी बोलतो म्हणून मामाकडून भाच्याची हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात