नितीश कुमार आणि भाजपच्या डबल इंजिन सरकारने बिहारला बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं, राहुल गांधी यांची टीका

नितीश कुमार आणि भाजपच्या डबल इंजिन सरकारने बिहारला बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं, राहुल गांधी यांची टीका

पाटण्यात युवा काँग्रेसने महारोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला हजारो तरुण तरुणीं हजेरी लावली. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बिहार सरकारवर जोरदार टीका केली. या महारोजगार मेळ्यात जमलेली गर्दी ही फक्त गर्दी नव्हे, तर एक स्पष्ट संदेश आहे. बिहारचा तरुण आता केवळ भाषणांवर नाही, तर रोजगारावर आपले भविष्य घडवू इच्छितो असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी भाजप आणि नीतीश कुमार यांच्या डबल इंजिन सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, “या सरकारने बिहारला बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं आहे, त्यामुळे लाखो तरुणांना रोजगाराच्या शोधासाठी बाहेरच्या राज्या जावं लागतं. या तरुणांना आपलं गाव, आपला परिवार सगळं मागे सोडावं लागतं.”

तसेच “बिहारचे तरुण मेहनती, कष्टकरी, आणि हुशार आहेत. त्यांना फक्त स्थानिक आणि सन्मानजनक रोजगाराची गरज असल्याचे राहुल गांधींनी म्हटले. आता बदलाची सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी फक्त आश्वासने नाही, तर उपाय घेऊन आली आहे. आमचा स्पष्ट उद्देश आहे प्रत्येक युवकाला रोजगार, त्याच्या कौशल्याला योग्य संधी, स्थलांतर थांबवणं आणि प्रत्येक कुटुंबाला एकत्र ठेवणं. हाच मार्ग आहे एका समृद्ध बिहारकडे जाण्याचा असेही राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी विश्वास संपादन केला, मग घरी बोलावत पायलटकडून एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार आधी विश्वास संपादन केला, मग घरी बोलावत पायलटकडून एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार
एका खासगी विमान कंपनीत काम करणाऱ्या पायलटनेच सहकारी एअर होस्टेसवर बलात्कार केल्याची घटना मीरा रोडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवघर...
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवारमध्ये चकमक; सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना घेरले
मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि पार्टी विथ डिफरन्स हे सिद्ध करावे; कैलास पाटील यांचे आव्हान
इंडोनेशियात भर समुद्रात प्रवासी जहाजाला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या समुद्रात उड्या
Ratnagiri News – दापोली मंडणगड मार्गावर खड्डयांचे साम्राज्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
हा महामार्ग आहे की भात लावणीचा चिखल? मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याची दुर्दशा
देवेंद्र दरबारी.. मंत्री रम्मी खेळती भारी! अमोल कोल्हे यांचा निशाणा