Pandharpur News – विठुरायाच्या दर्शनाची आस राहिली अधुरी! चंद्रभागा नदीत बुडून जालन्याच्या तीन महिलांचा मृत्यू

Pandharpur News – विठुरायाच्या दर्शनाची आस राहिली अधुरी! चंद्रभागा नदीत बुडून जालन्याच्या तीन महिलांचा मृत्यू

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलांची दर्शनाची आस अधुरीच राहिली आहे. दर्शनाआधी महिला भाविक चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी 7 वाजता घडली आहे. यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले असून एका महिलेचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. या महिला जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील आहेत.

श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील महिला आल्या होत्या. या महिला शनिवारी सकाळी चंद्रभागा स्नान करण्यासाठी 7 वाजता आल्या होत्या. चंद्रभागेत पुंडलिक मंदिरालगत स्नान करण्यासाठी उतरल्या होत्या. यामध्ये सुनीता माधव सपकाळ (वय 43) आणि संगीता संजय सपकाळ (वय 40) या दोन महिलांसह आणखी एक महिला अशा तिघींना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्या आहेत. या महिला पाण्यात बुडाल्याचे इतर महिलांनी पाहिल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे इतर महिला पाण्यात गेल्या नाहीत. मात्र बुडालेल्या महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

संगीता संजय सपकाळ व सुनीता माधव सपकाळ या दोन महिलांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या बुडालेल्या महिलेचा शोध सुरू आहे. वास्तविक पाहता पंढरपूर प्रशासनाने चंद्रभागा नदीत आपत्कालीन घटनेसाठी जीवरक्षक एक बोट आणि कर्मचारी दिल्याचा गवगवा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात नदीत कोणतीही आपत्कालीन व्यवस्था नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – मुंबईच्या पाहुण्यांसह चौघांचा आरेवारे समुद्रात बुडून मृत्यू Ratnagiri News – मुंबईच्या पाहुण्यांसह चौघांचा आरेवारे समुद्रात बुडून मृत्यू
आरेवारे समुद्रावर फिरायला गेलेले चौघेजण समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी रत्नागिरीत घडली. मयतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. उज्मा...
मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलत आहेत… सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा गंभीर आरोप
हैदराबादहून फुकेतला निघालेले एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान 16 मिनिटांतच परतले, कारण काय?
5 लढाऊ विमानांचे सत्य काय आहे? देशाला समजायलाच हवे! ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा मोदींना सवाल
Raigad News – पावसाळी पर्यटनासाठी आलेला मुंबईचा पर्यटक पाझर तलावात बुडाला
Pandharpur News – विठुरायाच्या दर्शनाची आस राहिली अधुरी! चंद्रभागा नदीत बुडून जालन्याच्या तीन महिलांचा मृत्यू
स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी ‘सायलेंट किलर’; शरीरात विषासारख्या पसरतात