Ratnagiri News – मुंबई गोवा महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या टॅंकरला आग

Ratnagiri News – मुंबई गोवा महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या टॅंकरला आग

मुंबई-गोवा महामार्गावर केमिकल वाहून नेणार्‍या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली. राजापूर तालुक्यातील पन्हळे माळवाडी येथे ही घटना घडली. टॅंकरला आग लागल्यानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच राजापूर नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवली.

आगीत टँकरचे मागची चाके आणि अन्य भाग जळून खाक झाला. टँकरला लागलेल्या आगीची माहिती मिळताच राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव आणि सहकारी पोलीस यांसह सिंधुदुर्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अर्धवट जळलेल्या स्थितीतील टँकर रस्त्यातून बाजूला करण्यात आला असून या मार्गावरील त्या भागातील वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – मुंबईच्या पाहुण्यांसह चौघांचा आरेवारे समुद्रात बुडून मृत्यू Ratnagiri News – मुंबईच्या पाहुण्यांसह चौघांचा आरेवारे समुद्रात बुडून मृत्यू
आरेवारे समुद्रावर फिरायला गेलेले चौघेजण समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी रत्नागिरीत घडली. मयतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. उज्मा...
मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलत आहेत… सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा गंभीर आरोप
हैदराबादहून फुकेतला निघालेले एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान 16 मिनिटांतच परतले, कारण काय?
5 लढाऊ विमानांचे सत्य काय आहे? देशाला समजायलाच हवे! ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा मोदींना सवाल
Raigad News – पावसाळी पर्यटनासाठी आलेला मुंबईचा पर्यटक पाझर तलावात बुडाला
Pandharpur News – विठुरायाच्या दर्शनाची आस राहिली अधुरी! चंद्रभागा नदीत बुडून जालन्याच्या तीन महिलांचा मृत्यू
स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी ‘सायलेंट किलर’; शरीरात विषासारख्या पसरतात